शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

तीन हजार विद्यार्थी फेरमूल्यांकनापासून वंचित

By admin | Updated: September 3, 2014 01:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनाचे निर्देश जारी केले होते. परंतु उन्हाळी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सुमारे तीन हजार

नागपूर विद्यापीठ : प्रशासन व महाविद्यालयांमध्ये समन्वयाचा अभावनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनाचे निर्देश जारी केले होते. परंतु उन्हाळी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सुमारे तीन हजार विद्यार्थी इच्छा असूनदेखील फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास अपयशी ठरले आहेत. हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकीच्या चौथ्या सेमिस्टरचे आहेत.विद्यापीठाने ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनासंदर्भात २७ आॅगस्ट रोजी निर्देश जारी केले होते. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल २३ आॅगस्टनंतर जाहीर झाले आहेत, त्यांचे अर्ज निर्देश क्रमांक २४/२०१४ अंतर्गत स्वीकारण्याची सूचना देण्यात आली होती. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या चौथ्या सेमिस्टरच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांचे निकाल घोषित केले. यात जवळपास साडेचार हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रणालीवर विश्वास नसल्याने अनेकदा उत्तीर्ण विद्यार्थीदेखील अर्ज करतात. निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ३ सप्टेंबर ही निर्धारित करण्यात आली होती.परंतु निर्देश जारी झाल्यानंतर ही तारीख ३० आॅगस्ट करण्यात आली व विद्यार्थ्यांना याची सूचनाच देण्यात आली नाही. १ सप्टेंबर रोजी अर्ज करण्यासाठी महाविद्यालयांत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्जच स्वीकारण्यात आले नाही. महाविद्यालयांनी विद्यापीठाचे निर्देश असल्याचे सांगत हात वर केले. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील विद्यार्थ्यांची मदत करण्यास नकार दिला.(प्रतिनिधी)केवळ एकच दिवसाचा अवधीअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आॅनला़ईन’ फेरमूल्यांकन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला होता. विद्यापीठाने २७ आॅगस्ट रोजी निर्देश जारी केले. ३० आॅगस्ट रोजी हे निर्देश संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात आले. विद्यापीठाने दावा केला आहे की, महाविद्यालयांना त्याच दिवशी माहिती देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी केवळ २८ आॅगस्टचा एकच दिवस मिळाला. २९ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीची सुटी होती व ३० आॅगस्ट रोजी शनिवार असल्यामुळे अर्धा दिवस कामकाज होते. यासंदर्भात प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.