शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

तीन हजारावर अंगणवाड्या १५ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना ...

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपाचा फटका : शिक्षण व पोषण आहार ठप्प, प्रशासन हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना बसत आहे.अंगणवाड्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच पोषण आहारसुद्धा देण्यात येतो. त्याचबरोबर ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. अंगणवाडीच्या परिसरातील गरोदर व स्तनदा मातांची काळजी घेऊन त्यांना पोषक आहार दिला जातो. किशोरी मुलींनासुद्धा आहार पुरविण्याची योजना अंगणवाड्याच्या माध्यमातून केली जाते. या सर्व सेवा ११ सप्टेंबरपासून बंद आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजारावर अंगणवाड्या आहेत. त्यात सहा हजाराच्या जवळपास अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. ६० हजारांवर बालके अंगणवाडीचा लाभ घेतात. कुपोषण निर्मूलनाचे महत्त्वाचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत आहे. संपाला १५ दिवस लोटूनही बालकांच्या, गर्भवती मातांच्या, किशोरी मुलींच्या आरोग्यासंदर्भात शासनाने पर्यायी व्यवस्था केली नाही. शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत कार्यरत ‘आशा’ कर्मचाºयांना अंगणवाडीचा ताबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आशांनीही या कामाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे शासनाला अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. अंगणवाड्यांना सेविकांनी कुलूप ठोकले आहे.बालकांची दुरवस्था होत असल्याची आम्हाला खंत आहे. पण याला खºया अर्थाने शासन जबाबदार आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता आणि शासनाने दिलेल्या जबाबदाºया बघता अंगणवाडी सेविकांना १०,५०० व मदतनीस यांना ८,५०० रुपये मानधन करून द्यावे, ही मागणी आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.प्रीती पराते, कोषाध्यक्ष, नागपूर जिल्हा अंगणवाडी संघटना.