शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारावर अंगणवाड्या १५ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना ...

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपाचा फटका : शिक्षण व पोषण आहार ठप्प, प्रशासन हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना बसत आहे.अंगणवाड्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच पोषण आहारसुद्धा देण्यात येतो. त्याचबरोबर ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. अंगणवाडीच्या परिसरातील गरोदर व स्तनदा मातांची काळजी घेऊन त्यांना पोषक आहार दिला जातो. किशोरी मुलींनासुद्धा आहार पुरविण्याची योजना अंगणवाड्याच्या माध्यमातून केली जाते. या सर्व सेवा ११ सप्टेंबरपासून बंद आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजारावर अंगणवाड्या आहेत. त्यात सहा हजाराच्या जवळपास अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. ६० हजारांवर बालके अंगणवाडीचा लाभ घेतात. कुपोषण निर्मूलनाचे महत्त्वाचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत आहे. संपाला १५ दिवस लोटूनही बालकांच्या, गर्भवती मातांच्या, किशोरी मुलींच्या आरोग्यासंदर्भात शासनाने पर्यायी व्यवस्था केली नाही. शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत कार्यरत ‘आशा’ कर्मचाºयांना अंगणवाडीचा ताबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आशांनीही या कामाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे शासनाला अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. अंगणवाड्यांना सेविकांनी कुलूप ठोकले आहे.बालकांची दुरवस्था होत असल्याची आम्हाला खंत आहे. पण याला खºया अर्थाने शासन जबाबदार आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता आणि शासनाने दिलेल्या जबाबदाºया बघता अंगणवाडी सेविकांना १०,५०० व मदतनीस यांना ८,५०० रुपये मानधन करून द्यावे, ही मागणी आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.प्रीती पराते, कोषाध्यक्ष, नागपूर जिल्हा अंगणवाडी संघटना.