शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तीन हजारावर अंगणवाड्या १५ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना ...

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संपाचा फटका : शिक्षण व पोषण आहार ठप्प, प्रशासन हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप लागूनही प्रशासन पर्यायी उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. त्याचा फटका मात्र या चिमुकल्याना बसत आहे.अंगणवाड्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच पोषण आहारसुद्धा देण्यात येतो. त्याचबरोबर ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. अंगणवाडीच्या परिसरातील गरोदर व स्तनदा मातांची काळजी घेऊन त्यांना पोषक आहार दिला जातो. किशोरी मुलींनासुद्धा आहार पुरविण्याची योजना अंगणवाड्याच्या माध्यमातून केली जाते. या सर्व सेवा ११ सप्टेंबरपासून बंद आहेत. जिल्ह्यात जवळपास तीन हजारावर अंगणवाड्या आहेत. त्यात सहा हजाराच्या जवळपास अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. ६० हजारांवर बालके अंगणवाडीचा लाभ घेतात. कुपोषण निर्मूलनाचे महत्त्वाचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत आहे. संपाला १५ दिवस लोटूनही बालकांच्या, गर्भवती मातांच्या, किशोरी मुलींच्या आरोग्यासंदर्भात शासनाने पर्यायी व्यवस्था केली नाही. शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत कार्यरत ‘आशा’ कर्मचाºयांना अंगणवाडीचा ताबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आशांनीही या कामाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे शासनाला अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. अंगणवाड्यांना सेविकांनी कुलूप ठोकले आहे.बालकांची दुरवस्था होत असल्याची आम्हाला खंत आहे. पण याला खºया अर्थाने शासन जबाबदार आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता आणि शासनाने दिलेल्या जबाबदाºया बघता अंगणवाडी सेविकांना १०,५०० व मदतनीस यांना ८,५०० रुपये मानधन करून द्यावे, ही मागणी आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.प्रीती पराते, कोषाध्यक्ष, नागपूर जिल्हा अंगणवाडी संघटना.