शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

’एनएडीटी’तील तीन विद्यार्थी नागरी सेवेत

By admin | Updated: June 2, 2017 02:36 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या ३४ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली होती.

आतापर्यंत ९५ विद्यार्थ्यांची निवड : प्रत्येकी दहा आयएएस व आयपीएस व दोन आयएफएसलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या ३४ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली होती. त्यापैकी ७ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जुने मॉरिस कॉलेज परिसरात असलेल्या सुसज्ज प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधासह योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी बसणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली. लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेसाठी या संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून यामध्ये दक्षदिग पाल नंदेश्वर, शरयू एच. आदे व निखिल बोरकर हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहे. या संस्थेची स्थापना झाल्यापासून ९५ विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र ठरले असून यामध्ये दहा आयएएस, दहा आयपीएस, दोन आयएफएस, तसेच ७३ अनुषंगिक सेवा विभागासाठी त्यांची निवड झाली आहे.भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून यासाठी प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होते. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरायचे असून ६६६.स्र१ी्रं२ल्लँस्र४१.ङ्म१ॅ.्रल्ल या वेबसाईटवर प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या निवड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शंभर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परीक्षेला कुठल्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी पात्र आहे. १ जानेवारीपासून नियमित अभ्यासक्रमाला सुरुवात होते. दहा विद्यार्थ्यांची बार्टीतर्फे तर दहा विद्यार्थ्यांची अल्पसंख्याक या घटकातून निवड करण्यात येत असून विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये भत्ता देण्यात येत असल्याची माहिती यावेळी या संस्थेचे अधीक्षक संजय जगताप यांनी दिली.प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी सुसज्ज लायब्ररी अभ्यासिका, निवास व्यवस्था असून विद्यार्थ्यांना भारतीय प्रत्यक्ष कर अकादमीतर्फे नियमित मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेमधून नागरी सेवा परीक्षा निवडीसाठी प्राधान्य देण्यात येत असून येथील विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्तीर्ण होत आहे. या संस्थेचे विद्यार्थी महाराष्ट्रातील शासनाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.