शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

एकाच वेळी तीन मैत्रिणी बेपत्ता

By admin | Updated: June 25, 2017 01:51 IST

एकाच वस्तीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस

शाळकरी विद्यार्थिनी : सोनेगावमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच वस्तीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनेगावात खळबळ उडाली. बेपत्ता असलेल्या तीन मुलींपैकी दोन आठवीच्या विद्यार्थिनी (वय १३) आणि एक दहावीची विद्यार्थिनी (वय १५) आहे. सोनेगावच्या इंद्रप्रस्थनगरात आजूबाजूला राहणाऱ्या या तिघी मैत्रिणी आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता त्या घरून निघून गेल्या. नेहमीप्रमाणे बाहेर गेल्या असाव्या असे समजून पालकांनी फारसे लक्ष दिले नाही. सायंकाळ झाली तरी त्या परत आल्या नाही. त्यामुळे आजूबाजूला विचारपूस सुरू झाली. एकीने रागाच्या भरात आम्ही निघून जात आहो, असे सांगितल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मैत्रिणींकडे शोध घेऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने पालकांनी सोनेगाव ठाण्यात सायंकाळी तक्रार नोंदविली. एकीने घरच्या रागावर तर दुसरीने घरी मन लागत नसल्यामुळे पळ काढल्याची चर्चा आहे. एकसाथ तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पोलिसांनीही लगेच शोधाशोध सुरू केली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सोनेगावचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली. दिल्लीकडे गेल्याचा संशय या मुली दिल्लीकडे गेल्या असाव्या, असा संशय आहे. कारण घरून त्या रेल्वेस्थानकावर गेल्या आणि तेथून त्यांनी तिकीट घेतल्यानंतर पळतच फलाटावर उभी असलेली रेल्वेगाडी पकडली. ज्या वेळेचे हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यावेळी दिल्लीकडे जाणारी रेल्वेगाडी पहिल्या फलाटावर उभी होती, असे समजते. दरम्यान, तीनही मुलींच्या घरची स्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यामुळे त्यांना प्रवासाला जाण्यासाठी पैसे कुणी दिले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नामुळेच त्या तिघींना कुणी फूस लावून पळण्यास बाध्य केले असावे, असा कयास बांधला जात आहे.