शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

उत्तर नागपुरात तीन उड्डाण पूल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात आता तीन उड्डाणपूल निर्माण होणार आहेत. आतापर्यंत ९० हजार कोटी विकास कामांसाठी नागपुरात आणले. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजप्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, अशोक मेंढे आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासाठी ८० कोटी खर्च करण्यात येणार असून या पुलाची लांबी ७४० मीटर आहे.

इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक ते शीतलामाता मंदिर असा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. या कामाची किंमत ४४० कोटी आहे. पुढे डागा हॉस्पिटलजवळ उड्डाणपुलावर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्पची तरतूद करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल अशोक चौकातून पुढे उमरेड रोडपर्यंत प्रस्तावित आहे.

शहरालगत केंद्रीय मार्ग निधीतून ४५०कोटींचा काँक्रीटचा रिंग रोड बांधला. त्यापुढे १२०० कोटींचा रिंग रोड पुन्हा घेण्यात आला आहे. आधी उत्तर नागपुरातून महाल भागात जाणे अडचणीचे होते. पण इटारसी उड्डाणपुलामुळे आता १०मिनिटात हे अंतर कापता येणार आहे. तसेच उत्तर नागपुरात सर्वात मोठा मॉल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले. सध्या मेट्रोच्या असलेल्या मर्यादा वाढवून कन्हान, बुटीबोरी, हिंगणा गावापर्यंत मेट्रो नेण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रोबाबत १५ दिवसात निर्णय होईल. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा शहरवासीयांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये ५६ हजार तरुणांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला. येत्या २वर्षात १ लाख रोजगार उपलब्ध होतील.

प्रधामंत्री योजना, स्वच्छ भारत, शेतकऱ्यासाठी किसान रेल्वे, शहराला मुबलक पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे गडकरी म्हणाले.