शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

उत्तर नागपुरात तीन उड्डाण पूल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात आता तीन उड्डाणपूल निर्माण होणार आहेत. आतापर्यंत ९० हजार कोटी विकास कामांसाठी नागपुरात आणले. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजप्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, अशोक मेंढे आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासाठी ८० कोटी खर्च करण्यात येणार असून या पुलाची लांबी ७४० मीटर आहे.

इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक ते शीतलामाता मंदिर असा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. या कामाची किंमत ४४० कोटी आहे. पुढे डागा हॉस्पिटलजवळ उड्डाणपुलावर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्पची तरतूद करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल अशोक चौकातून पुढे उमरेड रोडपर्यंत प्रस्तावित आहे.

शहरालगत केंद्रीय मार्ग निधीतून ४५०कोटींचा काँक्रीटचा रिंग रोड बांधला. त्यापुढे १२०० कोटींचा रिंग रोड पुन्हा घेण्यात आला आहे. आधी उत्तर नागपुरातून महाल भागात जाणे अडचणीचे होते. पण इटारसी उड्डाणपुलामुळे आता १०मिनिटात हे अंतर कापता येणार आहे. तसेच उत्तर नागपुरात सर्वात मोठा मॉल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले. सध्या मेट्रोच्या असलेल्या मर्यादा वाढवून कन्हान, बुटीबोरी, हिंगणा गावापर्यंत मेट्रो नेण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रोबाबत १५ दिवसात निर्णय होईल. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा शहरवासीयांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये ५६ हजार तरुणांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला. येत्या २वर्षात १ लाख रोजगार उपलब्ध होतील.

प्रधामंत्री योजना, स्वच्छ भारत, शेतकऱ्यासाठी किसान रेल्वे, शहराला मुबलक पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे गडकरी म्हणाले.