शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर नागपुरात तीन उड्डाण पूल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात आता तीन उड्डाणपूल निर्माण होणार आहेत. आतापर्यंत ९० हजार कोटी विकास कामांसाठी नागपुरात आणले. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजप्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, अशोक मेंढे आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासाठी ८० कोटी खर्च करण्यात येणार असून या पुलाची लांबी ७४० मीटर आहे.

इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक ते शीतलामाता मंदिर असा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. या कामाची किंमत ४४० कोटी आहे. पुढे डागा हॉस्पिटलजवळ उड्डाणपुलावर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्पची तरतूद करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल अशोक चौकातून पुढे उमरेड रोडपर्यंत प्रस्तावित आहे.

शहरालगत केंद्रीय मार्ग निधीतून ४५०कोटींचा काँक्रीटचा रिंग रोड बांधला. त्यापुढे १२०० कोटींचा रिंग रोड पुन्हा घेण्यात आला आहे. आधी उत्तर नागपुरातून महाल भागात जाणे अडचणीचे होते. पण इटारसी उड्डाणपुलामुळे आता १०मिनिटात हे अंतर कापता येणार आहे. तसेच उत्तर नागपुरात सर्वात मोठा मॉल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले. सध्या मेट्रोच्या असलेल्या मर्यादा वाढवून कन्हान, बुटीबोरी, हिंगणा गावापर्यंत मेट्रो नेण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रोबाबत १५ दिवसात निर्णय होईल. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा शहरवासीयांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये ५६ हजार तरुणांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला. येत्या २वर्षात १ लाख रोजगार उपलब्ध होतील.

प्रधामंत्री योजना, स्वच्छ भारत, शेतकऱ्यासाठी किसान रेल्वे, शहराला मुबलक पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे गडकरी म्हणाले.