शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

विदर्भातील तीन जिल्हे ‘हिट अलर्ट’च्या ‘हिट लिस्ट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:08 IST

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तडाख्याने नागरिकांच्या मस्तकावर आठ्या पाडल्या आहेत. उन्हाळ्याच्या ...

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तडाख्याने नागरिकांच्या मस्तकावर आठ्या पाडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुुरुवात केली असून, तापमानामध्ये सामान्यपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळा जाेमात येण्याआधीच हवामान विभागाने हिट अलर्ट जारी केले आहे. विदर्भातील अकाेला, वाशिम आणि ब्रम्हपुरी व चंद्रपूरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. राजस्थान, गुजरातकडून उत्तर-पूर्व वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मध्य भारतातील तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. याचा फटका विदर्भालाही बसला आहे. थंडीचा काळ लाेटला आणि लगेच उन्हाचे चटके वाढले आहेत. जाणकारांच्या मते सुरुवातीलाच अशाप्रकारची उष्णता कधी अनुभवली नाही. सर्वाधिक ३९.८ अंश तापमान ब्रम्हपुरी येथे नोंदविण्यात आले. त्यापाठोपाठ चंद्रपूर ३९.२, अकोला ३९.१, वाशिम ३८ अंश तापमान नाेंदविण्यात आले. या काळात ही सर्वाधिक नाेंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हवामान विभागाने या तिन्ही ठिकाणी काही भागात उष्ण लहर (हिट वेव्ह) येण्याची शक्यताही नाेंदविली असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र उष्ण लहरीची तीव्रता अधिक नसून फार धाेकादायक नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तरी नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याची सूचना केली आहे.

या जिल्ह्यासह सर्वच जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा ५ अंशाने अधिक आहे आणि पुढचे पाच दिवस तापमान असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नाेंदविला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने एप्रिल व मे महिन्यात काय हाल हाेतील, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने मात्र याबाबत काही सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.

इतर जिल्ह्याचे तापमान

ब्रह्मपुरी ३९.८

अमरावती ३८.२

नागपूर ३७.७

वर्धा ३७.५

गडचिराेली ३७.२

बुलडाणा ३७

गाेंदिया ३५.५

यवतमाळ ३५

उष्ण वाऱ्यामुळे वाढले तापमान : साहू

हवामान विभागाचे संचालक एम.एन. साहू यांनी सांगितले, सध्या राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे नागपूर व विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. थंड किंवा उष्ण प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्याचे इतर भागात परिणाम हाेतात. वाऱ्याची दिशा बदलली की आपाेआप तापमान खाली येईल, असा दावा त्यांनी केला. पुढे तापमानात अधिक वाढ हाेईल, ही शक्यताही त्यांनी नाकारली आहे.