शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

तेंदू घटक विक्रीअभावी तीन कोटींचा फटका

By admin | Updated: May 21, 2014 01:02 IST

मध्यचांदा वन विभागातील २६ तेंदू घटकांपैकी १० घटकांची विक्रीच न झाल्याने हजारो मजुरांना रोजीरोटी पासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे त्यांना मजुरीपोटी

राजुरा : मध्यचांदा वन विभागातील २६ तेंदू घटकांपैकी १० घटकांची विक्रीच न झाल्याने हजारो मजुरांना रोजीरोटी पासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे त्यांना मजुरीपोटी मिळणार्‍या सुमारे तीन कोटी रुपयांना मुकावे लागणार आहे. मध्यचांदा वन विभागात एकूण २६ तेंदू घटक आहेत. त्यापैकी कंत्राटदारांनी १६ घटक खरेदी करुन तेंदू पाने गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी शासनाने तेंदू पाने गोळा करण्याच्या दरात वाढ करुन १६५ रुपये प्रती शेकडा निश्चित केला आहे. तसेच कंत्राटदाराने खरेदी केलेल्या किंमतीच्या ३० टक्के खर्च वजा करुन उर्वरित रक्कम बोनस रुपात मजुरांना वाटप केली जाते. गोरगरीब आदिवासी व इतर मजुरांना अवघ्या १५ दिवसांच्या कामात मोठी रक्कम मिळत होती. ही रक्कम मजुरांची वर्षभराची आर्थिक पुंजी आहे. यावर्षी शासनाने वेळोवेळी निविदा काढून कंत्राटदारांना तेंदूघटक विकण्याचा प्रयत्न केला. बिडी उद्योगावर आलेली मंदी व तेंदू घटकाची निर्धारित रक्कम जास्त असल्यामुळे खरेदीवर त्याचा परिणाम झाला. तसेच आचारसंहितेमुळे कंत्राटदारांसोबत तडजोड करण्यात अडचण निर्माण झाली. वरिष्ठ वन अधिकार्‍यांनी निर्धारित रक्कमेच्या ४० टक्के कमी दराच्या रकमेपर्यंत निविदा मंजूर केल्या आहेत. उर्वरित कोठारी क्षेत्रातील बेंबाळ, दिघोरी, घोसरी, केमारा, कोठारी, पोंभुर्णा, राजुरा क्षेत्रातील विहिरगाव, विरुर क्षेत्रातील देवाडा, वनसडी क्षेत्रातील चांदूर व वनसडी अशा १० घटकांची विक्रीच झाली नाही. या घटकातील हजारो मजूर मजुरीपासून वंचित झाले आहेत. संबंधित मजुरांना अंदाजे तीन कोटी रक्कम मजुरीपोटी मिळणार होती. तसेच बोनस रक्कम मिळणार होती. परंतु विक्रीअभावी मजुरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तेंदूपाने ही नैसर्गिक उपज आहे. यावर वन विभागास कोणताच खर्च करावा लागत नाही. हीच बाब गृहीत धरुन शासनाने रॉयल्टीपोटी मिळणारी रक्कम मजुरांना बोनस रुपात देणे सुरू केले होते. तेंदू हंगाम हा गरीब मजुरांना आर्थिक सहाय करणारा होता. या हंगामातून मिळणारी रक्कम मजुरांसाठी वर्षभराची आर्थिक अडचण दूर करण्याची पुंजी होती. परंतु विक्री न झाल्याने मजुरांचे मिळकतीचे स्वप्न भंग झाले आहे. विक्री न झालेले तेंदू घटक आजुबाजूच्या विक्री झालेल्या घटकधारकांकडून खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. तसेच शासनाने अविक्री घटकातील तेंदूपाने गोळा करण्यासाठी स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक समिती व ग्रामसभांनी ठराव घेवून अपुर्‍या प्रशिक्षणामुळे तेंदूपाने संकलन करण्यास इच्छुक नसल्याचा ठराव घेवून तसे वन अधिकार्‍यांना कळविले आहे. त्यामुळे १० घटकातील मजुरांना यावर्षी तेंदूपाने हंगामापासून मुकावे लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)