शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात साडेतीनशे कुटुंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे. ही जीर्ण इमारत केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. पर्यायी घरकुल न मिळाल्याने या चाळधारकांना नाईलाजाने येथे राहावे लागत आहे. तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात ही कुटुंब जीवन जगत आहेत.

तीस वर्षांपूर्वी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली होती. मॉडेल मिलचे हस्तांतरण २ जुलै १९९९ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी चाळीतील रहिवाशांना तीन महिन्यात पर्यायी घरे उपलब्ध करण्याचे आश्वासन तत्कालिन पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु, २० वर्षे झाली तरीही चाळधारकांना हक्काचे घर मिळालेले नाही.

मॉडेल मिल चाळ सुधार संघर्ष समितीने वेळोवेळी तत्कालिन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली. परंतु, येथील कामगारांना घरे मिळालेली नाहीत. मॉडेल मिल बंद होऊन १५ वर्षे झाली तर ३० वर्षांपासून चाळधारक हक्काच्या घरांची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनेही केली, मात्र न्याय मिळालेला नाही.

...

करारानंतरही घरे मिळाली नाहीत

मॉडेल मिल चाळीची जागा राज्य शासनाने एन. टी. सी.ला लीजवर दिली होती. हा करार ७ डिसेंबर २०११पर्यंत होता. या जमिनीवर कामगारांना घरे बांधून देण्यासाठी ३.१६ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. चाळीची जागा पी. पी. असोसिएट्स या बिल्डरला विकली आहे. यावेळी एन. टी. सी.आणि पी. पी. असोसिएट्स यांच्यात झालेल्या करारानुसार येथील कामगारांना विनामूल्य ३०० चौरस फुटाची घरे बांधून देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, घरे बांधून मिळालेली नाहीत.

....

दिलेली लिज रद्द करा

चाळीच्या जमिनीची लिज २०११मध्ये संपली. मात्र, नझुल अधिकाऱ्यांनी कामगारांना विश्वासात न घेता, ही जमीन पी. पी. असोसिएट्सला ३० वर्षांच्या लिजवर दिली. मात्र, केलेल्या करारानुसार कामगारांना घरे बांधून न दिल्यामुळे ही लिज रद्द करावी, अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव डोंगरे यांनी केली आहे.

.....

३ महिन्याचे आश्वासन ३० वर्षानंतही अपूर्ण

मॉडेल मिळ चाळधारकांना ३ महिन्यात घरे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ३० वर्षे झाली तरी घरे मिळालेली नाहीत. २००४ मध्ये न्यायालयाने कामगारांना घरे देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून चाळधारकांचा संघर्ष चालू आहे. परंतु अजूनही त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे.