शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात साडेतीनशे कुटुंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे. ही जीर्ण इमारत केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. पर्यायी घरकुल न मिळाल्याने या चाळधारकांना नाईलाजाने येथे राहावे लागत आहे. तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात ही कुटुंब जीवन जगत आहेत.

तीस वर्षांपूर्वी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली होती. मॉडेल मिलचे हस्तांतरण २ जुलै १९९९ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी चाळीतील रहिवाशांना तीन महिन्यात पर्यायी घरे उपलब्ध करण्याचे आश्वासन तत्कालिन पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु, २० वर्षे झाली तरीही चाळधारकांना हक्काचे घर मिळालेले नाही.

मॉडेल मिल चाळ सुधार संघर्ष समितीने वेळोवेळी तत्कालिन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली. परंतु, येथील कामगारांना घरे मिळालेली नाहीत. मॉडेल मिल बंद होऊन १५ वर्षे झाली तर ३० वर्षांपासून चाळधारक हक्काच्या घरांची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनेही केली, मात्र न्याय मिळालेला नाही.

...

करारानंतरही घरे मिळाली नाहीत

मॉडेल मिल चाळीची जागा राज्य शासनाने एन. टी. सी.ला लीजवर दिली होती. हा करार ७ डिसेंबर २०११पर्यंत होता. या जमिनीवर कामगारांना घरे बांधून देण्यासाठी ३.१६ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. चाळीची जागा पी. पी. असोसिएट्स या बिल्डरला विकली आहे. यावेळी एन. टी. सी.आणि पी. पी. असोसिएट्स यांच्यात झालेल्या करारानुसार येथील कामगारांना विनामूल्य ३०० चौरस फुटाची घरे बांधून देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, घरे बांधून मिळालेली नाहीत.

....

दिलेली लिज रद्द करा

चाळीच्या जमिनीची लिज २०११मध्ये संपली. मात्र, नझुल अधिकाऱ्यांनी कामगारांना विश्वासात न घेता, ही जमीन पी. पी. असोसिएट्सला ३० वर्षांच्या लिजवर दिली. मात्र, केलेल्या करारानुसार कामगारांना घरे बांधून न दिल्यामुळे ही लिज रद्द करावी, अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव डोंगरे यांनी केली आहे.

.....

३ महिन्याचे आश्वासन ३० वर्षानंतही अपूर्ण

मॉडेल मिळ चाळधारकांना ३ महिन्यात घरे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ३० वर्षे झाली तरी घरे मिळालेली नाहीत. २००४ मध्ये न्यायालयाने कामगारांना घरे देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून चाळधारकांचा संघर्ष चालू आहे. परंतु अजूनही त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे.