शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत,

ठळक मुद्दे६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला प्रारंभ : महिला परिषदेतील वक्त्यांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित महिला परिषदेत निघाला.६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला दीक्षाभूमीवर बुधवारपासून सुरुवात झाली. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला परिषदेने याची सुरुवात करण्यात आली. कमलताई गवई या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या तर डॉ. जुल्फी शेख, पुष्पा बौद्ध, डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, भुवनेश्वरी मेहरे प्रमुख वक्त्या होत्या.डॉ. सरोज आगलावे यावेळी बोलताना म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना मोठे अधिकार दिले आहेत. एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे तत्त्व म्हणजेच मानवी मूल्य होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.रेखा खोब्रागडे म्हणाल्या भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. संविधानात अनेक अधिकार दिले आहेत. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानात ते नमूद आहे. संविधानाच्या जनजागृतीची मोहीम नागपुरातून सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. जुल्फी शेख यांनी आपल्याला एक धर्म आहे, त्याची एक भाषा आहे. त्याचा निर्माता आहे आणि मार्गदाता सुद्धा आहे. तेव्हा आपल्या धर्माची भाषा (पाली) अवगत करा आणि त्याची संस्कृती जपून एकजूट राहा, असे आवाहन केले. कमलताई गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानावर प्रकाश टाकत बौद्ध महिलांनी एकजूट राहून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. तक्षशीला वाघधरे यांनी संचालन केले. वंदना जीवने यांनी आभार मानले.बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करायावेळी पुष्पा बौद्ध म्हणाल्या आपण बौद्ध आहोत, त्यामुळे बौद्धासारखेच राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. परंतु त्याचे पालन व आचरण होताना दिसून येत नाही. या २२ प्रतिज्ञा म्हणजेच बौद्ध धम्म होय, तेव्हा त्याचे पालन झालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.आजपासून धम्मदीक्षाधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात. मागील काही वर्षांपासून दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू केला आहे. याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्खू गण बौद्ध धम्माची दीक्षा देतात. यंदा गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू होईल. ३० सप्टेंबरपर्यंत तो सुरू राहील. गुरुवारी सायंकाळी ‘भीमा तुझ्या जन्मामूळे’ हे नाटक सुद्धा सादर करण्यात येईल.आंबेडकरी अनुयायी दाखलधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्य सोहळा शनिवारी आहे. बुधवारपासून आंबेडकरी अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. बीड, औरंगाबाद येथील अनुयायी बुधवारीच दीक्षाभूमीत दाखल झाले.