शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

चीनमधील ते तीन आठवडे थरकाप उडविणारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 11:31 IST

विदर्भातील चार वैद्यकीय विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या होत्या. दोन्ही देशांतील सरकारच्या मदतीमुळे त्या बुधवारी आपापल्या घरी परतल्या. त्यांनी प्रशासनाला कोरोनाचे थरारक अनुभव सांगितले.

ठळक मुद्देत्यांनी अनुभवला ‘कोरोना’चा कहर वुहानमधील विद्यार्थिनींनी सांगितले थरारक अनुभवजानेवारीपासून होत्या बंदिस्त वातावरणात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्चशिक्षणासाठी त्या घर, देश यापासून दूर असतानाच स्वप्नातही विचार केला नाही असे संकट ओढविले. ‘कोरोना’चा कहर सुरू असताना त्या वातावरणात राहणे म्हणजे क्षणाक्षणाला परीक्षा होती. ना वसतीगृहाबाहेर निघणे, ना कुणाशी थेट संपर्क करणे. निराशा वाढत होती अन् भितीचे प्रमाणदेखील. अखेर भारत सरकारच्या प्रयत्नांतून त्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला अन् जीवघेण्या वादळातून सुखरुप बाहेर पडल्याचीच अनुभूती आली.कोरोना आजारामुळे चीनमध्ये रोज मृत्यू होत असून संपूर्ण जग त्याच्या दहशतीत आहे. या परिस्थितीत विदर्भातील चार वैद्यकीय विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या होत्या. दोन्ही देशांतील सरकारच्या मदतीमुळे त्या बुधवारी आपापल्या घरी परतल्या. त्यांनी प्रशासनाला कोरोनाचे थरारक अनुभव सांगितले.प्राची भालेराव (अकोला), सोनाली भोयर (गडचिरोली), कोमल जड्डेवार (नांदेड) व अन्य एक विद्यार्थिनी चीनमधील वुहान शहरातल्या हुबेई युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी येथे वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. कोरोना आजाराची साथ पाहता त्यांना जानेवारीपासूनच वसतिगृहाच्या खोल्यांमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. त्यांनी तब्बल तीन आठवडे वसतिगृहात काढले. त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांना १७ दिवस स्वतंत्र परिसरात ठेवून सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्यात करण्यात आल्या. कोरोनाची लागण झाली नसल्याचे अहवाल आल्यानंतर सर्वांना आपापल्या घरी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले. चीनमध्ये कोरोना आजार रोज नागरिकांचा बळी घेत आहे. तेथील मेट्रो, विमानसेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. कुणीही मोकळेपणाने फिरू शकत नाही, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली.त्यांनी दोन्ही देशांतील प्रशासनाने घेतलेल्या काळजीची प्रशंसा केली. वसतिगृहात बंदिस्त असताना त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक वस्तू व सुविधा पुरविण्यात आल्या. १ फेब्रुवारी रोजी भारतीय नागरिकांच्या पहिल्या बॅचला देशात परतण्याची परवानगी देण्यात आली. त्यात या विद्यार्थिनींचाही समावेश होता. भारतात परतल्यानंतर सर्वांना १७ दिवस इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. दरम्यान, सरकार व सेनेने सर्वांची चांगली काळजी घेतली. त्यांच्यासाठी इनडोअर जिम, कॅरम, टेबल टेनिस, चेस इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे अहवाल आल्यानंतर सरकारने प्रत्येकाला त्यांच्या घरी सोडून देण्याची व्यवस्था केली, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना