शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

आठ पंपातून भागते वन्यप्राण्यांची तहान

By admin | Updated: April 27, 2017 02:03 IST

उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते.

सौरपंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा : वन विभागाचा कळमेश्वर वनपरिक्षेत्रात उपक्रम कळमेश्वर : उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने वन विभागाने कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या निमजी व लिंगा बिटमध्ये पाणवठ्यालगत बोअरवेल करून त्यावर सौर प्लेट बसवून पंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. वन विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वन्यप्राण्यांची संख्याही वाढत आहे. कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत लिंगा, निमजी बिट १२३०.६३ हेक्टर परिसर जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, चितळ, मोर आदी वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्याअभावी जंगलाबाहेर भटकंती करावी लागते. यामुळे या प्राण्यांना शिकाऱ्यांची भीती असून वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतीच्या सभोवताल लावलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही हे वन्यप्राणी करीत असतात. या समस्येवर उपाय म्हणून सदर दोन्ही बिटांमध्ये नाला खोलीकरण, चार तळे व आठ सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावण्यात आले. सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे जंगलातील सौरपंप आपोआप सुरू होतात आणि सायंकाळी बंद होतात. यामुळे आठही पाणवठे पाण्याने पूर्णत: भरलेले असतात. शिवाय जंगलात खोदलेल्या चार तळ्यांपैकी दोन तळ्यांना उन्हाळ्यात पाणी आहे तर नाला खोलीकरणामुळे नाल्यामध्ये सद्यस्थितीत ३ ते ४ फुटापर्यंत पाणी उपलब्ध आहे. सदर तिन्ही योजना यशस्वी झाल्याने जंगलात सध्या भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वन्यप्राण्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)