शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

आठ पंपातून भागते वन्यप्राण्यांची तहान

By admin | Updated: April 27, 2017 02:03 IST

उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते.

सौरपंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा : वन विभागाचा कळमेश्वर वनपरिक्षेत्रात उपक्रम कळमेश्वर : उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने वन विभागाने कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या निमजी व लिंगा बिटमध्ये पाणवठ्यालगत बोअरवेल करून त्यावर सौर प्लेट बसवून पंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. वन विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वन्यप्राण्यांची संख्याही वाढत आहे. कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत लिंगा, निमजी बिट १२३०.६३ हेक्टर परिसर जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, चितळ, मोर आदी वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्याअभावी जंगलाबाहेर भटकंती करावी लागते. यामुळे या प्राण्यांना शिकाऱ्यांची भीती असून वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतीच्या सभोवताल लावलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही हे वन्यप्राणी करीत असतात. या समस्येवर उपाय म्हणून सदर दोन्ही बिटांमध्ये नाला खोलीकरण, चार तळे व आठ सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावण्यात आले. सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे जंगलातील सौरपंप आपोआप सुरू होतात आणि सायंकाळी बंद होतात. यामुळे आठही पाणवठे पाण्याने पूर्णत: भरलेले असतात. शिवाय जंगलात खोदलेल्या चार तळ्यांपैकी दोन तळ्यांना उन्हाळ्यात पाणी आहे तर नाला खोलीकरणामुळे नाल्यामध्ये सद्यस्थितीत ३ ते ४ फुटापर्यंत पाणी उपलब्ध आहे. सदर तिन्ही योजना यशस्वी झाल्याने जंगलात सध्या भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वन्यप्राण्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)