शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

घटस्फोटित मायबापहो मुलांचा विचार करा!

By admin | Updated: May 30, 2016 02:09 IST

भारतात विविध कारणांनी घटस्फोट होतात आणि घटस्फोट झालेले दाम्पत्य अहंकारामुळे एकमेकांचे तोंड पाहण्यासही तयार होत नाहीत.

भांडणाचा होतो वाईट परिणाम : हायकोर्टातील प्रकरणामुळे पुढे आली समस्याराकेश घानोडे नागपूरभारतात विविध कारणांनी घटस्फोट होतात आणि घटस्फोट झालेले दाम्पत्य अहंकारामुळे एकमेकांचे तोंड पाहण्यासही तयार होत नाहीत. अशावेळी खरा प्रश्न निर्माण होतो, तो त्यांच्या मुलांच्या भविष्याचा. दोघांनीही सकारात्मक भूमिका ठेवली नाही तर, मुले अंध:कारात ढकलली जातात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असेच एक प्रकरण दाखल झाले होते. यातील घटस्फोटित दाम्पत्याच्या मुलीचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणावर नुकताच अंतिम निर्णय दिला असून, त्यात मुलीच्या शिक्षणाचा प्राधान्याने विचार करण्यात आला.प्रकरणातील घटस्फोटित दाम्पत्य सूरज (नागपूर) व कविता (भंडारा) यांना गार्गी नामक एकमेव कन्या असून, ती सध्या नाशिक येथील एका प्रसिद्ध निवासी शाळेत शिक्षण घेत आहे (तिन्ही नावे काल्पनिक). सूरजने गार्गीला नाशिक येथील निवासी शाळेत टाकण्याची परवानगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावेळी कविताने यास विरोध केला नव्हता. यामुळे ९ मे २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने सूरजचा अर्ज मंजूर केला. यानंतर सूरजने कविताकडून गार्गीचा ताबा घेतला व तिला ६ जून २०१४ रोजी शाळेत टाकले. दरम्यान, कविताने अचानक कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर करून गार्गीचा ताबा मिळण्याची विनंती केली. सूरज गार्गीला बळजबरीने घेऊन गेल्याचा दावा तिने केला. सूरजने यावर वेळेवर उत्तर न दिल्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने गार्गीचा ताबा कविताकडे देण्याचा आदेश दिला, तसेच निवासी शाळेला तसे कळविण्यास सांगितले. परिणामी गार्गीच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सूरजने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गार्गीचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन वादग्रस्त आदेश रद्द केला व प्रकरण कायद्यानुसार नव्याने निर्णय घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाकडे परत पाठविले. मात्र या प्रकरणामुळे घटस्फोटित दाम्पत्यांच्या मुलांचे भवितव्य कसे असुरक्षित असते हे समाजापुढे आले.न्यायमूर्तींनी घेतली मुलीची भेटउच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. त्यापूर्वी त्यांनी चेंबरमध्ये गार्गीची व्यक्तिश: भेट घेतली. गार्गीसोबत काही वेळ संवाद साधल्यानंतर ती बुद्धीने अत्यंत हुशार व चपळ असल्याचे न्यायमूर्तींना दिसून आले. परिणामी, न्यायालयाने चांगले शिक्षण मिळाल्यास गार्गीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे निर्णयात नमूद केले. तसेच आई-वडिलांच्या भांडणामुळे तिच्या शैक्षणिक जीवनावर वाईट परिणाम पडत असल्याचे निरीक्षण नोंदविले.कौटुंबिक न्यायालयावर नाराजीकौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात अत्यंत घाईने निर्णय दिल्यामुळे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कविताच्या अर्जात केवळ गार्गीचा ताबा देण्याची विनंती करण्यात आली होती. यामुळे गार्गी सूरजच्या ताब्यात आहे का, हे प्रथम निश्चित करायला हवे होते आणि उत्तर नकारार्थी मिळाल्यास गार्गीला निवासी शाळेतून काढल्यास तिच्या शैक्षणिक भविष्य व वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होईल काय, याचा विचार करायला हवा होता. परंतु यावर विचारच करण्यात आला नाही, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदविला.