शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

... आणि घमासान चर्चेनंतर 'त्यांनी' संमत केले 'समान नागरी कायदा विधेयक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:45 IST

Nagpur News संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल.

ठळक मुद्देदेशाच्या हृदयस्थळी सुरू झालेली चर्चा दिल्लीत जाणार का?

 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असलेल्या समान नागरी कायद्याची केंद्र सरकार कधी अंमलबजावणी करणार, याबाबत चर्चा सुरू आहेतच. या चर्चांदरम्यान संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित विद्यार्थी संसदेत हे विधेयक मांडण्यात आले होते.

अगदी संसदेत काम चालते त्याप्रमाणे हे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संसदेचे सदस्य होते व सत्तापक्ष-विरोधीपक्ष-अपक्ष अशी विभागणीदेखील झाली होती. सुरुवातीपासूनच काही ना काही वादात असलेल्या या संसदेत पहिल्याच दिवशी समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात आले. या संसदेतील विधीमत्री असलेल्या विशाल खरचवालने हे विधेयक मांडले. देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीदेखील इच्छा होती.

सर्व धर्मांसाठी देशात एकच कायदा असायला हवा. विशिष्ट धर्मांसाठी असलेल्या ‘पर्सनल लॉ बोर्ड’ या संकल्पनेमुळे देशाच्या धोरणतत्त्वाला बाधा पोहोचली आहे. धार्मिक कायद्याचा फायद्यासाठीच उपयोग करण्यात येतो. सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी हा कायदा आवश्यक आहे, अशी भूमिका सत्तापक्षाने मांडली. त्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याचा जोरदार विरोध केला. विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या भाग्यश्री पांडेने यावर सर्वोच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा दाखला दिला. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. जाणूनबुजून हा कायदा आणला जात असून, धार्मिक स्वातंत्र्य ओरबाडून घेण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणणे सदस्यांनी मांडले.

या विधेयकात अनेक सुधारणा आवश्यक असल्याची सूचना समोर आली. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर हे विधेयक विद्यार्थी संसदेत बहुमताने संमत करण्यात आले. संघ मुख्यालयापासून जवळच झालेल्या विद्यार्थी संसदेत संमत झालेले विधेयक खरोखरच संसदेतदेखील येईल का, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

विद्यार्थ्यांमध्ये दिसले भविष्यातील सुसंस्कृत नेते

या विद्यार्थी संसदेत निवडप्रक्रियेद्वारे सदस्य निवडण्यात आले होते. देवेंद्र पै यांनी त्यांना संसदेच्या कामकाजाबाबत प्रशिक्षणच दिले होते. खरोखर सभागृहाप्रमाणेच सर्व कामकाज चालविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील सुसंस्कृत व ओजस्वी नेते दिसून आले. विद्यार्थी संसदेत मान्य करण्यात आलेला संबंधित प्रस्ताव लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे. आयोजन समिती कार्याध्यक्ष विष्णू चांगदे व सचिव डॉ. अभय मुद्गल यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ