शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

... आणि घमासान चर्चेनंतर 'त्यांनी' संमत केले 'समान नागरी कायदा विधेयक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:45 IST

Nagpur News संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल.

ठळक मुद्देदेशाच्या हृदयस्थळी सुरू झालेली चर्चा दिल्लीत जाणार का?

 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असलेल्या समान नागरी कायद्याची केंद्र सरकार कधी अंमलबजावणी करणार, याबाबत चर्चा सुरू आहेतच. या चर्चांदरम्यान संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित विद्यार्थी संसदेत हे विधेयक मांडण्यात आले होते.

अगदी संसदेत काम चालते त्याप्रमाणे हे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संसदेचे सदस्य होते व सत्तापक्ष-विरोधीपक्ष-अपक्ष अशी विभागणीदेखील झाली होती. सुरुवातीपासूनच काही ना काही वादात असलेल्या या संसदेत पहिल्याच दिवशी समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात आले. या संसदेतील विधीमत्री असलेल्या विशाल खरचवालने हे विधेयक मांडले. देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीदेखील इच्छा होती.

सर्व धर्मांसाठी देशात एकच कायदा असायला हवा. विशिष्ट धर्मांसाठी असलेल्या ‘पर्सनल लॉ बोर्ड’ या संकल्पनेमुळे देशाच्या धोरणतत्त्वाला बाधा पोहोचली आहे. धार्मिक कायद्याचा फायद्यासाठीच उपयोग करण्यात येतो. सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी हा कायदा आवश्यक आहे, अशी भूमिका सत्तापक्षाने मांडली. त्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याचा जोरदार विरोध केला. विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या भाग्यश्री पांडेने यावर सर्वोच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा दाखला दिला. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. जाणूनबुजून हा कायदा आणला जात असून, धार्मिक स्वातंत्र्य ओरबाडून घेण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणणे सदस्यांनी मांडले.

या विधेयकात अनेक सुधारणा आवश्यक असल्याची सूचना समोर आली. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर हे विधेयक विद्यार्थी संसदेत बहुमताने संमत करण्यात आले. संघ मुख्यालयापासून जवळच झालेल्या विद्यार्थी संसदेत संमत झालेले विधेयक खरोखरच संसदेतदेखील येईल का, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

विद्यार्थ्यांमध्ये दिसले भविष्यातील सुसंस्कृत नेते

या विद्यार्थी संसदेत निवडप्रक्रियेद्वारे सदस्य निवडण्यात आले होते. देवेंद्र पै यांनी त्यांना संसदेच्या कामकाजाबाबत प्रशिक्षणच दिले होते. खरोखर सभागृहाप्रमाणेच सर्व कामकाज चालविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील सुसंस्कृत व ओजस्वी नेते दिसून आले. विद्यार्थी संसदेत मान्य करण्यात आलेला संबंधित प्रस्ताव लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे. आयोजन समिती कार्याध्यक्ष विष्णू चांगदे व सचिव डॉ. अभय मुद्गल यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ