शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सोले, कोहळे म्हणतात कार्यकर्त्यांना संधी देऊ

By admin | Updated: August 17, 2016 02:13 IST

आ. अनिल सोले व भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्वत:च्या प्रभागातील जागेवर...

 आमदारांचे मनपातील वारस कोण ? : इच्छुक कार्यकर्ते सुखावले नागपूर : आ. अनिल सोले व भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्वत:च्या प्रभागातील जागेवर कुटुंबातील व्यक्तीला न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्याच्या पाठीशी उभे राहू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणारे व उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते सुखावले आहेत. लोकमतशी बोलताना आ. अनिल सोले म्हणाले, माझ्या जागेवर माझ्या कुटुंबातील कुणीही महापालिकेची निवडणूक लढणार नाही. माझा मुलगा इंजिनिअरिंग करीत आहे. दुसऱ्या मुलाचे हॉटेल मॅनेजमेंट झाले आहे. कुटुंबात राजकीय वारसा चालविण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. पण केवळ माझा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट देणे मला योग्य वाटणार नाही. शिवाय माझ्या कुटुंबाची राजकीय परंपरा नाही. पक्ष ज्या सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देईल, त्याच्या पाठिशी मी उभा राहील. शेवटी कार्यकर्त्यांच्या भरवशावर नेता घडत असतो. त्यामुळे नेत्यानेही कार्यकर्त्याला योग्य वेळी संधी द्यायला हवी. मी हे सूत्र स्वीकारले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. सुधाकर कोहळे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भरवशावर मी नगरसेवक झालो. पुढे मोठ्या मताधिक्क्याने दक्षिण नागपूरचा आमदार झालो. पक्षाने शहर अध्यक्षपदही दिले. आता अधिक मोह नको. मी महापालिकेतील माझी जागा कार्यकर्त्याला देणार आहे. माझ्या घरातून कुणीही महापालिकेची निवडणूक लढणार नाही. मी कार्यकर्त्याला तिकीट देऊन त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. प्रकाश गजभिये म्हणाले, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. राज्य सरकारने असा निर्णय घेऊन सर्वसामान्य व गरीब कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे. प्रभागाच्या सीमा काय असतील, आरक्षण काय असेल याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. सर्वच पक्षाचे उमेदवार संभ्रमात आहेत. त्यामुळे आपण या विषयावर अद्याप काहीच विचार केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोले व कोहळे यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आता शहरातील इतर आमदारही आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी तिकीट मागण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या पाठिशी राहतील का, असा प्रश्न आहे.