शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ते गरजूंसाठी करतात ‘कबाड से जुगाड’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

नागपूर : शहरातील अमरस्वरुप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार या संस्थांशी जुळलेले समाजसेवी गरजू व्यक्तींसाठी गेल्या चार महिन्यापासून ''कबाड ...

नागपूर : शहरातील अमरस्वरुप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार या संस्थांशी जुळलेले समाजसेवी गरजू व्यक्तींसाठी गेल्या चार महिन्यापासून ''कबाड से जुगाड'' करीत आहेत. या उपक्रमांतर्गत गरजूंना लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, पुस्तके, कपडे, फर्निचर इत्यादी वस्तू पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत शेकडो गरजूंना उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.

‘कबाड से जुगाड’ हा उपक्रम नावाप्रमाणेच ‘कबाड’पासून ‘जुगाड’ करणारा आहे. कालबाह्य झालेल्या, उपयोग संपलेल्या आणि थोडा बिघाड झाल्यामुळे टाकून दिल्या अशा, अनेक वस्तू घरामध्ये वर्षानुवर्षे पडल्या असतात. घरच्यांकरिता त्या वस्तू ''कबाड'' असतात आणि बरेचदा त्या वस्तू ''कबाड'' म्हणूनच मिळेल त्या किमतीत विकल्या जातात. त्या वस्तू गरजू व्यक्तींच्या उपयोगात येऊ शकतात याचा फार कमी विचार केला जातो. या सत्याची जाणिव झाल्यामुळे अमरस्वरुप फाऊंडेशनचे भूविष मेहता व पुलक मंच परिवारचे मनोज बंड यांनी कबाड से जुगाड उपक्रमाची आखणी केली. या उपक्रमामध्ये नागरिकांकडून त्यांच्या घरी विविध कारणांमुळे निरुपयोगी पडलेले लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, पुस्तके, कपडे, फर्निचर इत्यादी वस्तू गोळा केल्या जातात. त्यानंतर आवश्यक दुरुस्ती करून त्या वस्तू वापरण्यायोग्य केल्या जातात आणि गरजू व्यक्तींना वाटप केल्या जातात. या उपक्रमाने आतापर्यंत शेकडो गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शरद मचाले, रमेश उदेपूरकर, निर्मल शाह, राहुल मोहुर्ले, रवींद्र भुसारी, जय मेहता, सर्वेश किनारिवाला, प्रतीक जुनेजा आदी कार्यकर्ते कार्य करीत आहेत. मनीष मेहता यांनी वस्तू गोळा करणे व साठविण्यासाठी वाहने व जागा उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम समाजाकरिता प्रेरणादायी ठरला आहे.