शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

‘त्यांनी’ केली काेराेनाबाधितांच्या कुटुंबीयांची भाेजन व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ‘डोळ्यातल्या पाण्याला तू वरदान दे, उपाशी राहू नये असं देवा अन्नदान दे’ साेशल मीडियावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : ‘डोळ्यातल्या पाण्याला तू वरदान दे, उपाशी राहू नये असं देवा अन्नदान दे’ साेशल मीडियावरील कवितेच्या या चार ओळी सध्या वास्तविकतेला स्पर्श करणाऱ्या आहेत. सर्व कुटुंबीयच कोरोनाबाधित झाल्यानंतर अनेकांचे हाल-बेहाल झालेत. अशा कठीण प्रसंगात काहींनी ‘दुरावा’ साधला तर अनेकांनी अनेकांची साथ दिली. कोरोनाबाधित (विलगीकरणात) असलेल्या आणि संकटात अडकलेल्या कुटुंबीयांना दोन वेळच्या भोजनाची घरपोच व्यवस्था जेसीआय उमरेड या संस्थेने करीत सेवाभाव जपला. २७ एप्रिलपासून त्यांनी या सेवेचा भार उचलला. आतापर्यंत या संस्थेच्या सदस्यांनी महिनाभरापासून २७ कुटुंबीयांना ही सेवा प्रदान केली.

कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थितीत असंख्य संस्था-सामाजिक कार्यकर्त्यांचे सेवाव्रती हात पुढे आलेत. यामध्ये जेसीआय उमरेड या संस्थेनेसुद्धा खारीचा वाटा उचलत घरीच विलगीकरणात असलेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दोन वेळच्या भोजनाची घरपोच व्यवस्था केली. कोविड सेंटरमध्ये सेवारत परिचारिकांच्याही भोजनाची ऐनवेळी व्यवस्था करण्यासाठी ही संस्था धावली.

कोविड सेंटरमध्ये असंख्य रुग्ण गावखेड्यातील भरती होतात. लॉकडाऊनमुळे खाणावळी, भोजनालये, हॉटेल बंद आहेत. काही ठिकाणी पार्सलची सुविधा उपलब्ध आहे. असे असले तरी अनेकांना ते सुद्धा शक्य होत नाही. अशांनाही या संस्थेने अन्नदानाचे कार्य पार पाडले. संस्थेचे संस्थापक डॉ. शशिकांत जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे अध्यक्ष अतुल खांडेकर, प्रमोद चौधरी, अर्जुन गिरडे, प्रमोद रघुते, संजय ठाकरे, दिनेश पटेल, डॉ. विष्णुकांत मुंधडा, मनोज पंडित, आशिष वाढई यांनी सहकार्य केले. जेसीआयच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.