शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

ही आमची वारसास्थळे, इतिहासाबाबत आपुलकी कुठेच ना आढळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जे आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहासच विसरतो, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जे आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहासच विसरतो, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. अगदी विदर्भ, महाराष्ट्र, भारत खूप दूरची गोष्ट, नागपुरातच याचा साक्षात्कार घेता येतो. नागपुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत आणि त्यातील अनेक स्थळांची प्रकरणे कोर्टात आहेत. त्यातील काहींची जबाबदारी केंद्र आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाने घेतली आहेत. मात्र, ती जबाबदारी खरेच पार पाडली जात आहे का, हा प्रश्न आहे. अनेकांची तर नोंदही नाही. जवळपास सर्वच्या सर्व स्थळे खंगल्या अवस्थेत आहेत. त्यांच्याबाबत ना शासकीय संस्थांना ना आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे.

खामला येथून सहकारनगर विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर विमानतळाच्याच अखत्यारित असलेल्या जंगलात साधारणत: ३०० वर्षे जुने क्रिष्ण रुक्मिणी मंदिर आहे. हा एक स्थापत्याशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. येथे नजिकच गोंड-भोसले राजवटीच्या काळातील विहीर, नहर आणि अंघोळीसाठीचे ऐतिहासिक स्नानगृह आहे. कालांतराने येथे उरला आहे तो केवळ सापळाच. सर्व वास्तूंना भगदाड पडले आहेत. मंदिराच्या आणि नहरच्या मागच्या भागात गंजट्टी आणि मद्यपींचा फड रंगलेला असतो. येथेच लव्ह बर्ड्सचे चाळेही सुरू असतात. कुणालाच कुणाचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. पोलिसांची फेरी दुरूनच निदर्शनास येत असल्याने सगळे अलर्टही होत असतात. जणू काही सर्व व्यवस्थित आहे. याबाबत शासन-प्रशासनाकडून कुठेलच पाऊल उचलले गेले नाही, ही शोकांतिका आहे. आपल्या ऐतिहासिक स्थळ, वास्तूंबाबत असलेली ही उदासीनता अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

* हा गांजा पोलिसांना का सापडत नाही

एकीकडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणावर आगडोंब उसळला आहे. मात्र, नागपुरात या वारसास्थळांकडे सहसा कुणाचे लक्ष जात नसल्याची संधी साधून अनेक गंजट्टी व मद्यपी सर्रास गांजाचा कश बनवताना व ओढताना आढळून येतात. एवढेच नव्हे तर उत्सुकतेपोटी या स्थळाला भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींनाही ते यात सहभागी होण्याचे आवाहन करतात. या गोष्टींकडे सुरक्षा व्यवस्थेचे लक्ष का जात नाही, हा प्रश्न आहे.

* पुरातत्त्व विभाग कोण्या कामाचे

ऐतिहासिक स्थळांची निगा राखण्याचे व दुरुस्ती करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे असते. मात्र, शहरातील ही वारसास्थळे ढासळत चालली आहेत. याकडे या विभागांचे लक्ष नाही. तेव्हा हे विभाग कोण्या कामाचे, असा प्रश्न निर्माण होतो. संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा तर संबंधित अधिकारी कायम नॉट रिचेबल असतात, हे विशेष.

* दहाव्या वर्गात शिकणारे प्रज्वल ठाकरे, ओम काकडे व आर्यन आवळे हे विद्यार्थी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आम्ही इथे खेळायला येतो आणि जातो. हे स्थळ नेमके कोणत्या काळातील आहे, हे आम्हास ठाऊक नाही. मात्र, परिसर रम्य वाटतो, असे ते सांगतात.

..........