शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ही आमची वारसास्थळे, इतिहासाबाबत आपुलकी कुठेच ना आढळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जे आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहासच विसरतो, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जे आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहासच विसरतो, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. अगदी विदर्भ, महाराष्ट्र, भारत खूप दूरची गोष्ट, नागपुरातच याचा साक्षात्कार घेता येतो. नागपुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत आणि त्यातील अनेक स्थळांची प्रकरणे कोर्टात आहेत. त्यातील काहींची जबाबदारी केंद्र आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाने घेतली आहेत. मात्र, ती जबाबदारी खरेच पार पाडली जात आहे का, हा प्रश्न आहे. अनेकांची तर नोंदही नाही. जवळपास सर्वच्या सर्व स्थळे खंगल्या अवस्थेत आहेत. त्यांच्याबाबत ना शासकीय संस्थांना ना आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे.

खामला येथून सहकारनगर विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर विमानतळाच्याच अखत्यारित असलेल्या जंगलात साधारणत: ३०० वर्षे जुने क्रिष्ण रुक्मिणी मंदिर आहे. हा एक स्थापत्याशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. येथे नजिकच गोंड-भोसले राजवटीच्या काळातील विहीर, नहर आणि अंघोळीसाठीचे ऐतिहासिक स्नानगृह आहे. कालांतराने येथे उरला आहे तो केवळ सापळाच. सर्व वास्तूंना भगदाड पडले आहेत. मंदिराच्या आणि नहरच्या मागच्या भागात गंजट्टी आणि मद्यपींचा फड रंगलेला असतो. येथेच लव्ह बर्ड्सचे चाळेही सुरू असतात. कुणालाच कुणाचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. पोलिसांची फेरी दुरूनच निदर्शनास येत असल्याने सगळे अलर्टही होत असतात. जणू काही सर्व व्यवस्थित आहे. याबाबत शासन-प्रशासनाकडून कुठेलच पाऊल उचलले गेले नाही, ही शोकांतिका आहे. आपल्या ऐतिहासिक स्थळ, वास्तूंबाबत असलेली ही उदासीनता अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

* हा गांजा पोलिसांना का सापडत नाही

एकीकडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणावर आगडोंब उसळला आहे. मात्र, नागपुरात या वारसास्थळांकडे सहसा कुणाचे लक्ष जात नसल्याची संधी साधून अनेक गंजट्टी व मद्यपी सर्रास गांजाचा कश बनवताना व ओढताना आढळून येतात. एवढेच नव्हे तर उत्सुकतेपोटी या स्थळाला भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींनाही ते यात सहभागी होण्याचे आवाहन करतात. या गोष्टींकडे सुरक्षा व्यवस्थेचे लक्ष का जात नाही, हा प्रश्न आहे.

* पुरातत्त्व विभाग कोण्या कामाचे

ऐतिहासिक स्थळांची निगा राखण्याचे व दुरुस्ती करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे असते. मात्र, शहरातील ही वारसास्थळे ढासळत चालली आहेत. याकडे या विभागांचे लक्ष नाही. तेव्हा हे विभाग कोण्या कामाचे, असा प्रश्न निर्माण होतो. संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा तर संबंधित अधिकारी कायम नॉट रिचेबल असतात, हे विशेष.

* दहाव्या वर्गात शिकणारे प्रज्वल ठाकरे, ओम काकडे व आर्यन आवळे हे विद्यार्थी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आम्ही इथे खेळायला येतो आणि जातो. हे स्थळ नेमके कोणत्या काळातील आहे, हे आम्हास ठाऊक नाही. मात्र, परिसर रम्य वाटतो, असे ते सांगतात.

..........