शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

व्यवस्था परिवर्तनासाठीही लढावे लागणार

By admin | Updated: January 20, 2015 01:17 IST

सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे.

भामसंच्या अधिवेशनाचा समारोप : कृष्णचंद्र मिश्र यांचे आवाहन नागपूर : सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे. त्यामुळे आता व्यवस्था परिवर्तनासाठीसुद्धा आम्हाला लढावे लागेल, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री कृष्णचंद्र मिश्र यांनी येथे केले. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित भारतीय मजदूर संघाच्या १७ व्या विदर्भ प्रदेशच्या वार्षिक अधिवेशनाचा सोमवारी समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील अध्यक्षस्थानी होते. तर पश्चिम क्षेत्रीय संघटक रामदौर सिंह, भामसंचे माजी वित्त सचिव वसंतराव पिंपळापुरे, भामसं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभाकर बानासुरे, ज्येष्ठ नेते दिनकरराव जोशी व्यासपीठावर होते. कृष्णचंद्र मिश्र म्हणाले, नक्षलवाद ही एक समस्या आहे. परंतु लोक नक्षलवादाकडे का वळतात याचा विचार होत नाही. एखाद्या तरुणाच्या हातात बंदूक पकडण्याची परिस्थिती ही व्यवस्थाच निर्माण करीत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हितासाठी लढणारी कामगार संघटना आहे. स्वतंत्र भारतानंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पं. नेहरूंपासून तर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येक सरकार हे आमचेच आहे. जे सरकार कामगारांच्या हिताचा विचार करते, त्यांचे आम्ही समर्थन करतो. पण जे सरकार कामगारांच्या विरोधी भूमिका घेत असते, त्याविरोधात आम्ही आजवर लढत आलो आहोत, आणि यापुढेही लढत राहू, मग सरकार कुणाचेही असो. परंतु शत्रुसोबत लढणे सोपे असते, मात्र आपल्याच माणसाशी लढणे जरा कठीण असते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सत्ताधारी आणि अधिकारी हे कामगारांना काहीच किंमत देत नाही. तेव्हा कामगारांनी आपली शक्ती वाढवण्याची गरज आहे. सरकार कुणाचेही असो कामगारांच्या हितासाठी आम्ही लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.संघटनेला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कार्यकर्त्यांना वर्षभराचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी यावेळी आखून दिला. ३० जुलै रोजी संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर संघटनेचा झेंडा लावावा आणि प्रत्येक जिल्ह्यात पूर्णवेळ कार्यरत एका कार्यकर्त्याची नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. रमेश पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. महामंत्री अशोक भुताड यांनी प्रास्ताविक व संचालन केले. (प्रतिनिधी)