शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कापूस वेचणीला मजूर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

कामठी : परतीच्या पावसामुळे आधीच शेतातील कापसाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच कापूस वेचणीचे दरही वाढले. कपाशीचा दुसरा वेचा वेचण्यासाठी ...

कामठी : परतीच्या पावसामुळे आधीच शेतातील कापसाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच कापूस वेचणीचे दरही वाढले. कपाशीचा दुसरा वेचा वेचण्यासाठी प्रति किलाे ८ ते १० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने कामठी तालुक्यातील कापूस उत्पादक हवालदिल झाले आहेत.

यावर्षी तालुक्यातील ५,५७८ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे कपाशी लागवड क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीच्या काळात पिकाची अवस्था चांगली हाेती. मात्र, मध्यंतरी काेसळलेल्या पावसामुळे कापसाचा महत्त्वाचा पहिला वेचा भिजल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय, सततचा पाऊस व किडींचा प्रादुर्भाव यामुळे साेयाबीनचे पीकही शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त कपाशीच्या पिकावर आहे.

हल्ली कपाशीचा दुसरा वेचा वेचणीला आला आहे. तालुक्यात किलाेप्रमाणे कापसाची वेचणी केली जात असून, यावर्षी हे दर प्रति किलाे ८ ते१० रुपये झाले आहेत. या दराप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी करणे शक्य हाेत नाही. ही समस्या साेडवायची कशी, हे सुचेनासे झाले आहे, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

---

प्रत खालावली

सततचा तसेच परतीचा पाऊस तसेच प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी कपाशीवर बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेऊन बाेंडं काळी पडायला व सडायला सुरुवात झाली हाेती. त्यातच गुलाबी बाेंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येताे. दमट वातावरण व पावसामुळे बाेंडातील कापूस काळसर पडत असून, कापसाचा दर्जा खालावला आहे. त्यात गुलाबी बाेंडअळीने भर टाकली आहे. राेग व किडींपासून पिकाला वाचविण्यासाठी अतिरिक्त फवारणी करावी लागल्याने कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. प्रत खालावल्याने भाव मात्र कमी मिळत असल्यााने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.