शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

कापूस वेचणीला मजूर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

सज्जन पाटील लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : कुही तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत आहे. मात्र, यावर्षी वाढीव मजुरी देऊनही ...

सज्जन पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : कुही तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत आहे. मात्र, यावर्षी वाढीव मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना प्रसंगी बाहेरगावाहून मजूर आणावे लागत असून, त्यासाठी वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.

धान व मिरचीच्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या कुही तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून साेयाबीन व कपाशीच्या पिकाकडे वळले आहेत. काही वर्षांपासून साेयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट येत असल्याने, बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकावर लक्ष केंद्रित केले. यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला भरपूर पाऊस काेसळल्याने तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीच्या पिकाची वाढ खुंटल्यागत झाली. त्यातच फलधारणा व्हायला सुरुवात झाल्याने बुरशीमुळे पहिल्या फ्लॅशची बाेंडे सडायला लागली. त्यानंतर लगेच कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यातून पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे यावर्षी कापसाचा उत्पादनखर्च तुलनेत वाढला आहे.

दरवर्षी महिला मजूर सहा ते सात रुपये प्रति किलाेप्रमाणे कापसाची वेचणी करायचे. शिवाय, एक महिला दिवसभरात किमान ५० ते ६० किलाे कापसाची वेचणी करायची. यावर्षी कापूस वेचणीची मजुरी १० रुपयावर पाेहाेचली असून, ती देऊनही महिला कापूस वेचणीला यायला तयार नाहीत. शिवाय, एक महिला दिवसभरात केवळ १० ते १२ किलाे कापूस वेचत असल्याने, तसेच मजुराला २०० रुपये प्रति दिवस मजुरी द्यावी लागत असल्याने एक किलाे कापूस वेचायला शेतकऱ्यांना जवळपास २० रुपये माेजावे लागतात.

यावर्षी बाेंडअळीमुळे कापसाचे वजन कमी झाले असून, बाेंडातील कापूस चिकट असल्याची तसेच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कपाशीपेक्षा इतर पीक घेणे साेयीचे आहे, अशी प्रतिक्रिया मांढळ येथील लक्ष्मण माेटघरे, मनाेहर माेटघरे, राेशन कुरजेकर, नवेगाव येथील खुशाल ठवकर, वग येथील गणेश तितरमारे, पारडी येथील मनाेज खवास, वीरखंडी येथील पुष्पराज लाेखंडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिली.

...

साेयाबीनवर फिरविले राेटाव्हेटर

कुही तालुक्यात साेयाबीनचाही पेरा वाढला आहे. मात्र, काही वर्षांपासून साेयाबीनचे पीकही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी बुरशी व विषाणूजन्य राेगामुळे शेतातून साेयाबीनचा एक दाणाही घरी आला नाही. त्यामुळे राेटाव्हेटरने पीक काढावे लागले, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. काहींनी सूर्यफुलाचे पीक घेण्याचा प्रयाेग केला आहे. अलीकडच्या काळात मिरचीचा उत्पादनखर्च वाढत चालला असून, तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने तसेच मिरची ताेडायला मजूर मिळत नसल्याने मिरचीचे पीकही परवडण्याजाेगे राहिले नाही, असे मिरची उत्पादकांनी सांगितले.