शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीला मजूर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

सज्जन पाटील लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : कुही तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत आहे. मात्र, यावर्षी वाढीव मजुरी देऊनही ...

सज्जन पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : कुही तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत आहे. मात्र, यावर्षी वाढीव मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना प्रसंगी बाहेरगावाहून मजूर आणावे लागत असून, त्यासाठी वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.

धान व मिरचीच्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या कुही तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून साेयाबीन व कपाशीच्या पिकाकडे वळले आहेत. काही वर्षांपासून साेयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट येत असल्याने, बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकावर लक्ष केंद्रित केले. यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला भरपूर पाऊस काेसळल्याने तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीच्या पिकाची वाढ खुंटल्यागत झाली. त्यातच फलधारणा व्हायला सुरुवात झाल्याने बुरशीमुळे पहिल्या फ्लॅशची बाेंडे सडायला लागली. त्यानंतर लगेच कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यातून पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे यावर्षी कापसाचा उत्पादनखर्च तुलनेत वाढला आहे.

दरवर्षी महिला मजूर सहा ते सात रुपये प्रति किलाेप्रमाणे कापसाची वेचणी करायचे. शिवाय, एक महिला दिवसभरात किमान ५० ते ६० किलाे कापसाची वेचणी करायची. यावर्षी कापूस वेचणीची मजुरी १० रुपयावर पाेहाेचली असून, ती देऊनही महिला कापूस वेचणीला यायला तयार नाहीत. शिवाय, एक महिला दिवसभरात केवळ १० ते १२ किलाे कापूस वेचत असल्याने, तसेच मजुराला २०० रुपये प्रति दिवस मजुरी द्यावी लागत असल्याने एक किलाे कापूस वेचायला शेतकऱ्यांना जवळपास २० रुपये माेजावे लागतात.

यावर्षी बाेंडअळीमुळे कापसाचे वजन कमी झाले असून, बाेंडातील कापूस चिकट असल्याची तसेच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कपाशीपेक्षा इतर पीक घेणे साेयीचे आहे, अशी प्रतिक्रिया मांढळ येथील लक्ष्मण माेटघरे, मनाेहर माेटघरे, राेशन कुरजेकर, नवेगाव येथील खुशाल ठवकर, वग येथील गणेश तितरमारे, पारडी येथील मनाेज खवास, वीरखंडी येथील पुष्पराज लाेखंडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिली.

...

साेयाबीनवर फिरविले राेटाव्हेटर

कुही तालुक्यात साेयाबीनचाही पेरा वाढला आहे. मात्र, काही वर्षांपासून साेयाबीनचे पीकही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी बुरशी व विषाणूजन्य राेगामुळे शेतातून साेयाबीनचा एक दाणाही घरी आला नाही. त्यामुळे राेटाव्हेटरने पीक काढावे लागले, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. काहींनी सूर्यफुलाचे पीक घेण्याचा प्रयाेग केला आहे. अलीकडच्या काळात मिरचीचा उत्पादनखर्च वाढत चालला असून, तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने तसेच मिरची ताेडायला मजूर मिळत नसल्याने मिरचीचे पीकही परवडण्याजाेगे राहिले नाही, असे मिरची उत्पादकांनी सांगितले.