शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही, कोरोनाबाधितांचा ग्राफही घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST

सावनेर/काटोल/कुही/हिंगणा/उमरेड/कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ घटला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद ...

सावनेर/काटोल/कुही/हिंगणा/उमरेड/कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ घटला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. तेरा तालुक्यांत २७६९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७१ (२.५६ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,३४६ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,३८,१८७ कोरोनामुक्त झाले, तर २२९७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १४५८ इतकी आहे.

सावनेर तालुक्यात ६ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील एक तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात १५३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कुही तालुक्यात १६२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात वेलतुर व साळवा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली. हिंगणा तालुक्यात ११३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात डिगडोह येथे ३, वानाडोंगरी २, तर हिंगणा येथील एकाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ११,९६१ रुग्णांची नोंद झाली. ११,६७८ कोरोनामुक्त झाले. उमरेड तालुक्यात ७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे.

काटोल तालुक्याला दिलासा

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या काटोल तालुक्यात ३५० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे गत दोन महिन्यांपासून त्रस्त असलेल्या काटोलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-----

कोरोनामुक्तीसाठी पर्यावरण संवर्धनाचा जागर

गावागावात वृक्षारोपण : झाडे जगविण्याचा संकल्प

नागपूर : कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व जगाला कळले. ऑक्सिजनअभावी लाखो कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मानवी आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलित असणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्वावर नागपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती, नगर परिषदा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.