शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

शहरातील तलावांच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. विसर्जनानंतर तलावातील आॅक्सिजनची मात्रा दुप्पटीने कमी झाली आहे.

By admin | Updated: October 5, 2015 02:51 IST

विकास एका रात्रीत घडून येऊ शकत नाही. त्याकरिता वेळ देणे आवश्यक आहे अशी समज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

हायकोर्टाने दिला याचिकाकर्त्याला समज : रुग्णालयांच्या दुरवस्थेचे प्रकरणनागपूर : विकास एका रात्रीत घडून येऊ शकत नाही. त्याकरिता वेळ देणे आवश्यक आहे अशी समज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रुग्णालयांच्या दुरवस्थेवरील प्रकरणात याचिकाकर्त्याला दिली. तसेच, शासनाच्या विनंतीवरून याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.यासंदर्भात समाजसेवक दीनानाथ वाघमारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यातील माहितीनुसार, शासनाने शासकीय रुग्णालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी कायापालट योजना तयार केली आहे.याअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची १५ निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली आहे. त्यात वीज पुरवठा, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिन्या, इमारत देखभाल, शवविच्छेदन कक्ष, स्वच्छता सेवा, रुग्ण तपासणी सुविधा, रक्तपेढी सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांना अन्न पुरवठा, औषधांची उपलब्धता, रुग्णवाहिन्या, संचार सुविधा इत्यादी निकषांचा समावेश होता. सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यात सर्व प्रकारची १९६८ शासकीय रुग्णालये असून त्यात विविध प्रकारच्या समस्या आहेत. मूलभूत सुविधांच्या बाबतीत नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरीच पिछाडीवर असल्याचे पुढे आले आहे. याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी याकडे लक्ष वेधल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे समज दिली. यादरम्यान, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी कायापालट योजना टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)