शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

राज्यात रोज १ हजार ३६५ मेगावॅट वीज तुटवडा

By admin | Updated: May 21, 2014 01:03 IST

राज्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वीज धोरण ठरविण्याचे निश्चित केले होते; पण गत आठ वर्षांत वीज दरवाढ करण्यापलीकडे धोरणात फारसा बदल झाला नाही.

धोरणाचा पत्ताच नाही : नऊ वर्षांत १३ वेळा वीज दरवाढ

 ंअमोल सोटे - आष्टी (श़)(वर्धा)

राज्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वीज धोरण ठरविण्याचे निश्चित केले होते; पण गत आठ वर्षांत वीज दरवाढ करण्यापलीकडे धोरणात फारसा बदल झाला नाही. परिणामी, राज्यात रोज १ हजार ३६५ मेगावॅट वीज तुटवडा भासत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीज कंपनीचे विभाजन करुन महानिर्मिती, महापारेषण, महावितरण, एमएसईबी ओल्टींग असे भाग करण्यात आले. प्रत्येक भागाचे नियोजन निश्चित करण्यात आले. पण कार्यक्षमता आणि योग्य अंमलबजावणीचा अभाव, वीज गळतीचा गंभीर प्रश्न, वीजचोरी यामुळे तोटा सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाढते वीजदर हे राज्याच्या उद्योग व व्यवसाय वृद्धीला मारक ठरत आहेत. वीज संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारच्या ‘विद्युत सर्वांसाठी’ या प्रकल्पांतर्गत १ लाख मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी विविध प्रकल्प आखण्यात आले; पण योग्य व्यवस्थापनाअभावी व जमिनी हस्तांतरणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे या प्रकल्पास विरोध होत आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोळशावर आधारित गिर्ये अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट २०१७ पर्यंत पूर्ण करायचा आहे. त्यासाठी ३ ते ३.५ हजार एक जमिनीची गरज आहे. मात्र राज्य सरकार जमिनीचे योग्य भाव व पर्यायी नोकरीची हमी देऊनही शब्द पाळत नसल्याने या प्रकल्पाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे. सोबतच कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पालाही विरोधाचे ग्रहण लागले आहे. अणुऊर्जेविषयी भीती, जमीन हस्तांतरणाचा प्रश्न यामुळे १० हजार मेगावॅट ऊर्जेचा प्रकल्प संकटात आला आहे़ महाराष्ट्राला गुजरातमधून वीज आयात करावी लागते. गुजरातमधील मुंद्रा प्रकल्पातून ४ हजार मेगावॅटपैकी महाराष्ट्राला ७६० मेगावॅट वीज मिळत आहे. महाराष्टÑ देशात क्रमांक एकचे वीज निर्मिती राज्य असताना अनेक प्रकल्प बंद व कोळशाची टंचाई भासत असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. यासाठी कणखर वीज धोरण गरजेचे झाले आहे़