शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

राज्यात रोज १ हजार ३६५ मेगावॅट वीज तुटवडा

By admin | Updated: May 21, 2014 01:03 IST

राज्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वीज धोरण ठरविण्याचे निश्चित केले होते; पण गत आठ वर्षांत वीज दरवाढ करण्यापलीकडे धोरणात फारसा बदल झाला नाही.

धोरणाचा पत्ताच नाही : नऊ वर्षांत १३ वेळा वीज दरवाढ

 ंअमोल सोटे - आष्टी (श़)(वर्धा)

राज्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वीज धोरण ठरविण्याचे निश्चित केले होते; पण गत आठ वर्षांत वीज दरवाढ करण्यापलीकडे धोरणात फारसा बदल झाला नाही. परिणामी, राज्यात रोज १ हजार ३६५ मेगावॅट वीज तुटवडा भासत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीज कंपनीचे विभाजन करुन महानिर्मिती, महापारेषण, महावितरण, एमएसईबी ओल्टींग असे भाग करण्यात आले. प्रत्येक भागाचे नियोजन निश्चित करण्यात आले. पण कार्यक्षमता आणि योग्य अंमलबजावणीचा अभाव, वीज गळतीचा गंभीर प्रश्न, वीजचोरी यामुळे तोटा सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाढते वीजदर हे राज्याच्या उद्योग व व्यवसाय वृद्धीला मारक ठरत आहेत. वीज संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारच्या ‘विद्युत सर्वांसाठी’ या प्रकल्पांतर्गत १ लाख मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी विविध प्रकल्प आखण्यात आले; पण योग्य व्यवस्थापनाअभावी व जमिनी हस्तांतरणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे या प्रकल्पास विरोध होत आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोळशावर आधारित गिर्ये अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट २०१७ पर्यंत पूर्ण करायचा आहे. त्यासाठी ३ ते ३.५ हजार एक जमिनीची गरज आहे. मात्र राज्य सरकार जमिनीचे योग्य भाव व पर्यायी नोकरीची हमी देऊनही शब्द पाळत नसल्याने या प्रकल्पाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे. सोबतच कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पालाही विरोधाचे ग्रहण लागले आहे. अणुऊर्जेविषयी भीती, जमीन हस्तांतरणाचा प्रश्न यामुळे १० हजार मेगावॅट ऊर्जेचा प्रकल्प संकटात आला आहे़ महाराष्ट्राला गुजरातमधून वीज आयात करावी लागते. गुजरातमधील मुंद्रा प्रकल्पातून ४ हजार मेगावॅटपैकी महाराष्ट्राला ७६० मेगावॅट वीज मिळत आहे. महाराष्टÑ देशात क्रमांक एकचे वीज निर्मिती राज्य असताना अनेक प्रकल्प बंद व कोळशाची टंचाई भासत असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. यासाठी कणखर वीज धोरण गरजेचे झाले आहे़