शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शुद्ध मध म्हणून तुम्ही चाखता निव्वळ साखरेचे पाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 10:51 IST

Nagpur News ‘एफडीए’च्या तपासण्यांमध्ये देशातील ८०-८५ टक्के ब्रँडस‌्च्या मधामध्ये भेसळ आढळून आली असल्याने विभागातर्फे राज्यभर मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी माेहीम राबविली जात आहे.

ठळक मुद्देभारतात सुविधा नसल्याचा घेतात फायदा

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र अन्न व औषधी प्रशासनाने दाेन दिवसांत राबविलेल्या कारवाईने मधविक्रेत्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, त्याहीपेक्षा सामान्य ग्राहकांच्या भरवशाला तडा जाताे आहे. ‘एफडीए’च्या तपासण्यांमध्ये देशातील ८०-८५ टक्के ब्रँडस‌्च्या मधामध्ये भेसळ आढळून आली असल्याने विभागातर्फे राज्यभर मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी माेहीम राबविली जात आहे.

एफडीएने सर्व ब्रँडचे मधनिर्माता, विक्रेता व वितरकांकडून ८६ सॅम्पल गाेळा करून एनएमआर तपासणीसाठी जर्मनीला पाठविले हाेते. त्यांपैकी ५२ कंपन्यांचे सॅम्पल भेसळयुक्त आढळून आले आहेत; तर उर्वरित नमुन्यांचे रिपाेर्ट येणे बाकी आहे. विभागाने त्यानुसार ३६.१९ लाख रुपयांचा ३४८०.२५ किलाे मधाचा स्टाॅक जप्त केला आहे. या नमुन्यांमध्ये मॅनाेज, माल्टाेज, माल्टाेट्राईज ही शर्करामिश्रित भेसळ आढळली आहे. याचे मानवी आराेग्यावर विपरीत परिणाम हाेतात. यामध्ये माेठमाेठ्या कंपन्यांच्या ब्रँडचाही समावेश आहे. एफडीएने फूड सेफ्टी ॲन्ड स्टँडर्ड ॲक्टनुसार मधनिर्माता, विक्रेता व वितरकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सामान्य ग्राहकांपुढे शुद्ध मधाचा भरवसा काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

कशी हाेते भेसळ?

- साधारणत: मधाचे दाेन स्राेत आहेत. जंगलातून गाेळा हाेणारे मध व मधमाश्या पालकांकडून तयार हाेणारे मध.

- जंगलातील मध एका नाही तर अनेक व्यक्तींकडून घेतले जातात. दिवसेंदिवस मधमाश्या घटत आहेत. त्यामुळे कमी मध गाेळा झाल्यावर नफा कमावण्यासाठी भेसळ केली जाते. वैयक्तिक स्तरावर हाेणारी भेसळ शाेधणे अशक्य असते.

- जंगलातील मध गरम करून स्टाेअर केला जातो, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट हाेतात.

- मधमाश्या पालकांकडे भेसळीचे प्रकार आहेत. आसपास फुलांची उपलब्धता नसली तर अधिक उत्पादन व्हावे म्हणून मधमाश्यांना साखरपाणी दिले जाते.

- राणीमाशीने अधिक मध द्यावा म्हणून ॲन्टिबायाेटिक्सचाही उपयाेग केला जाताे.

- मध काढण्यासाठी लाेखंडी यंत्राचा वापर केला जाताे. त्याला अनेकदा गंज चढलेला असताे. त्यामुळे गुणवत्ता घसरण्याचा धाेका. मध गाेळा करण्यासाठी डालडा किंवा तेलाच्या पिंपामधूनही भेसळ हाेते.

 

कंपन्यांद्वारे हाेणारी भेसळ

- साखर किंवा गुळाचे मिश्रण करण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे; कारण ही भेसळ साध्या टेस्टमध्ये पकडली जाते.

- कंपन्यांत आता राईस सिरप, मका सिरपचा उपयाेग हाेताे. काही टेस्टमधून ती लक्षात येत असल्याने आता बीटरूट सिरपचा वापर वाढला आहे.

- काही माेठ्या कंपन्यांकडे आधुनिक प्रयाेगशाळा आहेत; पण त्यांचा उपयाेग भेसळ करण्यासाठी किंवा लपविण्यासाठी हाेताे.

भारतात नाही प्रयाेगशाळा

मधमाश्या अभ्यासक व नेचर्स बझ संस्थेचे प्रणव निंबाळकर यांनी सांगितले, भारतात मधातील भेसळ शाेधण्यासाठी सी-३ व सी-४ टेस्ट उपलब्ध आहे. या टेस्टद्वारेही शिताफीने हाेणारी भेसळ शाेधणे अशक्य हाेते. सर्व प्रकारची भेसळ शाेधण्यासाठी एनएमआर टेस्टची आवश्यकता आहे; पण ही प्रयाेगशाळा भारतात नाही. जर्मनीहून चाचण्या करून आणाव्या लागतात. उल्लेखनीय म्हणजे एफएसएसआयच्या स्टँडर्डनुसार एनएमआर टेस्ट बंधनकारक नाही व याचाच फायदा कंपन्या घेत असल्याचे ते म्हणाले. पाण्यात टाकून पाहणे, कागद किंवा कापडावर मध टाकून बघणे, या पारंपरिक पद्धती कुचकामी असल्याचेही प्रणव यांनी स्पष्ट केले.

सामान्य ग्राहकांना समजणे अशक्य

पाण्यात टाकून पाहणे, कागदावर किंवा कापडावर टाकणे, आदी पारंपरिक पद्धतीने मधाची शुद्धता ओळखता येत असल्याचा दावा केला जाताे. मात्र तज्ज्ञांच्या मते, या पद्धती १०० टक्के विश्वासार्ह नाहीत. प्रयाेगशाळेत एनएमआर चाचणी केल्याशिवाय मधाची गुणवत्ता ओळखणे अशक्यच आहे. त्यामुळे परिचित मधमाश्या पालकांकडूनच मध घेणे विश्वासार्ह ठरू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :foodअन्न