शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वसतिगृहात पाणीच नाही

By admin | Updated: August 19, 2016 02:29 IST

कळमना येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पिण्यासाठी, वापरासाठी पाणीच नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचा हल्लाबोल : अप्पर आयुक्त कार्यालयाला घेराव नागपूर : कळमना येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पिण्यासाठी, वापरासाठी पाणीच नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. वेळोवेळी प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्तांना पाण्यासाठी निवदनेही देण्यात आली. परंतु पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे गुरुवारी विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयाच्या गेटला कुलूप लावून जोरदार निदर्शने केली. दिवसभर हे विद्यार्थी पाण्यासाठी कार्यालय परिसरात ठिय्या देऊन बसले होते. कळमना येथे १००० आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहापैकी ‘एलएन’ या वसतिगृहात २६० विद्यार्थी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या वसतिगृहात पाणी नाही. पाणी पुरवठ्यासाठी वसतिगृहात एक बोअरवेल आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बोअरवेलही बंद पडली आहे. प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र हा अनियमित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात असलेल्या मंगल कार्यालयातून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. टँकरवर प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहे. परंतु पाण्याचा स्वतंत्र स्रोत निर्माण करता आला नाही. प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, वेळोवेळी प्रशासनाला कळवूनही कुठल्याच उपाययोजना होत नसल्याने विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. जोरदार निदर्शने केली. कार्यालयाचे गेट लावून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. शेवटी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे दिनेश शेराम, वसतिगृहातील विद्यार्थी विलास नैताम, नीलेश ठाकरे, सोनम बागडेरिया, विनोद वट्टी, दिनेश कोटंगी, योगेश कुडव, सागर सोळंके, दीपक येडमे, किशोर उईके सहभागी होते. (प्रतिनिधी)