शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वसतिगृहात पाणीच नाही

By admin | Updated: August 19, 2016 02:29 IST

कळमना येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पिण्यासाठी, वापरासाठी पाणीच नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचा हल्लाबोल : अप्पर आयुक्त कार्यालयाला घेराव नागपूर : कळमना येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पिण्यासाठी, वापरासाठी पाणीच नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. वेळोवेळी प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्तांना पाण्यासाठी निवदनेही देण्यात आली. परंतु पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे गुरुवारी विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयाच्या गेटला कुलूप लावून जोरदार निदर्शने केली. दिवसभर हे विद्यार्थी पाण्यासाठी कार्यालय परिसरात ठिय्या देऊन बसले होते. कळमना येथे १००० आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहापैकी ‘एलएन’ या वसतिगृहात २६० विद्यार्थी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या वसतिगृहात पाणी नाही. पाणी पुरवठ्यासाठी वसतिगृहात एक बोअरवेल आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बोअरवेलही बंद पडली आहे. प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र हा अनियमित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात असलेल्या मंगल कार्यालयातून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. टँकरवर प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहे. परंतु पाण्याचा स्वतंत्र स्रोत निर्माण करता आला नाही. प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, वेळोवेळी प्रशासनाला कळवूनही कुठल्याच उपाययोजना होत नसल्याने विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. जोरदार निदर्शने केली. कार्यालयाचे गेट लावून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. शेवटी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे दिनेश शेराम, वसतिगृहातील विद्यार्थी विलास नैताम, नीलेश ठाकरे, सोनम बागडेरिया, विनोद वट्टी, दिनेश कोटंगी, योगेश कुडव, सागर सोळंके, दीपक येडमे, किशोर उईके सहभागी होते. (प्रतिनिधी)