शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

‘दुर्वा’ पूर्ण होईपर्यंत दुसरी मालिका नाही

By admin | Updated: December 2, 2015 03:25 IST

लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत ‘धमाल दांडिया’च्या अंतिम फेरीसाठी नागपुरात आलेली स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ मालिकेची मुख्य अभिनेत्री रुता दुरगुले ...

रुता दुरगुले : नागपूरचे सावजी भोजन खासनागपूर : लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत ‘धमाल दांडिया’च्या अंतिम फेरीसाठी नागपुरात आलेली स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ मालिकेची मुख्य अभिनेत्री रुता दुरगुले हिने मंगळवारी माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारल्या. दुर्वा मालिकेनंतर अनेक मराठी चित्रपट व मालिकांची आॅफर मिळाली. ती करायची इच्छाही आहे. मात्र एकाच प्रोजेक्टवर चांगले काम करायचे हे महत्त्वाचे वाटत असल्याने दुर्वा पूर्ण होईपर्यंत दुसरी मालिका स्वीकारणार नाही, अशी कबुली रुता दुरगुले हिने यावेळी दिली.मुंबईच्या महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला असताना अनवधानाने मराठी मालिकेच्या आॅडिशनसाठी गेले. तेथेच रसिका देवधर यांच्याशी भेट झाली व दुर्वा मालिकेसाठी माझी निवड झाली. शिक्षण आणि मालिका असा समन्वय साधण्याचा विश्वास दिल्यानंतर घरच्यांनीही परवानगी दिली आणि माझा मालिकेचा प्रवास सुरू झाला. या मालिकेत विनय आपटे, शरद पोंक्षे, प्रसाद पंडित यांच्यासारखे दिग्गज कलावंत काम करीत असल्याने ही सुवर्णसंधी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, अशी प्रांजळ कबुली रुताने दिली. दुर्वा मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे व मालिकेत आपली मुख्य भूमिका आहे याचा अतिशय आनंद असल्याचे ती म्हणाली. लवकरच ही मालिका ९०० एपिसोड पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले. दुर्वा ही राजकीय कुटुंबातील कथा आहे. सुरुवातीला माझी भूमिका कॉलेज गोर्इंग मुलीची होती. त्यामुळे ते सोप गेलं. मात्र त्यानंतर भूमिकेला राजकीय वळण मिळाले. राजकारणाचा फारसा गंध नसल्याने मलाही याबाबत अभ्यास करावा लागल्याचे तिने सांगितले. समाजकार्याची आवड आहे, मात्र राजकारणात येण्याचा कुठलाही विचार नसल्याचे ती म्हणाली. नागपुरात पहिल्यांदा आली आहे. येथील सावजी व संत्रा बर्फीबाबत फार ऐकून होते. त्यामुळे आल्याबरोबर सावजी भोजनावर ताव मारल्याचे तिने सांगितले; शिवाय सेटवरच्या बऱ्याच लोकांनी संत्राबर्फी आणण्याचे सांगितले होते. त्यामुळे संत्राबर्फीही विकत घेतल्याचे तिने यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)धमाल दांडियाबाबत एक्साईटेडदांडिया हा आधीपासूनच आवडता विषय आहे. मात्र एक सेलिब्रिटी म्हणून मी पहिल्यांदा सहभागी झाली आहे. रणवीरसिंह सोबत असल्याने लोकमतच्या धमाल दांडियाबाबत खूप एक्साईटेड असल्याची भावना रुता दुरगुले हिने व्यक्त केली.