शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महामार्ग वर्गीकृत करण्यासाठी मनपाकडून प्रस्ताव नाही

By admin | Updated: April 13, 2017 03:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गांजवळ असलेल्या राज्यभरातील १५ हजारांहून अधिक दारू दुकानांना फटका बसला आहे.

राज्यातील १५ हजारांहून अधिक दारूदुकाने बंद : प्रस्ताव आल्यास शासन विचार करणार नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गांजवळ असलेल्या राज्यभरातील १५ हजारांहून अधिक दारू दुकानांना फटका बसला आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून देखील शासनदरबारी मागणी होत आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर मनपाकडून याबाबत कुठलाही प्रस्ताव शासनाला गेलेला नाही. खुद्द उत्पादनशुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ही माहिती दिली आहे. महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याचा फटका राज्यातील एकूण १५६९९ दुकानांना बसला. नागपूर जिल्ह्यात ८७१ दुकाने बंद झाली. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग नागपूर मनपाकडे वर्गीकृत करण्यात यावे, अशी मागणी दारू दुकान मालक तसेच लोकप्रतिनिधींकडूनदेखील होत आहे. अनेक शहरांत ‘बायपास’ मार्ग झाले आहेत. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर जड वाहने येणे कमी झाले आहे. देशातील बऱ्याच शहरात असे मार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात २००१ च्या शासननिर्देशांनुसार यासंबंधी तरतूद आहे. जी दुकाने बंद झाली आहेत, तेथे अवैधरीत्या दारूविक्री होत नसेल याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे महापालिकेचा किंवा नगर परिषदेचा प्रस्ताव आला तर शासननिर्देश असल्यामुळे महामार्ग हस्तांतरणाबाबत विचार करण्यात येईल. अद्यापपर्यंत असा प्रस्ताव आला नसल्याचेदेखील बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)