शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या गुणवत्तेची योग्य तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:25 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाण्याच्या गुणवत्तेची केलेली तपासणी योग्य झाली नाही. यादरम्यान पारशिवनी तालुक्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घोळ असल्याचे मत खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देआरोग्य सभापतींची समितीच्या बैठकीत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाण्याच्या गुणवत्तेची केलेली तपासणी योग्य झाली नाही. यादरम्यान पारशिवनी तालुक्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घोळ असल्याचे मत खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले आहे.मंगळवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. पारशिवनी तालुक्यातील पाण्याचे सगळेच नमुने स्वच्छ होते असे या अहवालात नमूद आहे. मात्र आपल्याकडे या तालुक्यातील अस्वच्छ आणि दूषित पाण्याबाबत अनेक तक्रारी आल्याचे खुद्द सभापती डोणेकर म्हणाले.ग्रामीण भागातील पाणी स्वच्छ आहे की नाही यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. दर महिन्यात ही तपासणी होते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते.तसेच संबंधित ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून मे महिन्यात तपासण्यात आलेल्या ५९१ पैकी पाण्याच्या नमुन्यापैकी ७८ अर्थात १३ टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याची बाब मंगळवारच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीतून समोर आली.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण