शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकही खड्डा नाही !

By admin | Updated: February 5, 2016 02:22 IST

शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध भागांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

महापालिकेचा खोटारडेपणा : माहितीच्या अधिकारातून ‘पोलखोल’नागपूर : शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध भागांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु नागपुरात एकही खड्डा दिसत नाही, असा माहितीच्या अधिकारातच महानगरपालिकेने असा दावा केला असून मनपाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांत खड्डे पडले असताना माहितीच्या अधिकारातून मनपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे.शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार शहराच्या हद्दीत असलेल्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम ‘हॉट मिक्स प्लँन्ट मशीन’च्या आधारे नियमितपणे करण्यात येते. परंतु शहरात तर अनेक ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. महानगरपालिका प्रशासनाचे त्याच्याकडे बहुधा लक्ष गेलेले नाही. दरम्यान, विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केल्यानंतर ते बुजविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेचीच असते खड्डे न बुजविल्यामुळे रिलायन्स जियो इन्फोकॉम लि. यांच्याकडून २ कोटी १८ लाख १५ हजार ५५२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असेदेखील माहितीमध्ये नमूद आहे.(प्रतिनिधी)नागरिकांद्वारे प्राप्त झाल्या केवळ १४ तक्रारीशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात शहरातील नागरिकांकडून रोज ओरड करण्यात येते. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. परंतु मनपाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१३ ते २० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत केवळ १४ नागरिकांनीच तक्रारी दाखल केल्या आहेत. मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक यांच्याकडून ४२७ तक्रारी प्राप्त झाल्या तर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी १८७ तक्रारी केल्या. अधिकारी हवेत उडतात का ?नागपूर शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. परंतु मनपाने दिलेल्या अधिकृत उत्तरात एकही खड्डा नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटारडा तर आहेच. यामागे मनपातील भ्रष्टाचार कारणीभूत आहे की अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुधा मनपाचे अधिकारी थेट हवेतूनच प्रवास करत असावेत. म्हणूनच की काय शहरात एकही खड्डा नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे..