शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शहरात एकही खड्डा नाही !

By admin | Updated: February 5, 2016 02:22 IST

शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध भागांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

महापालिकेचा खोटारडेपणा : माहितीच्या अधिकारातून ‘पोलखोल’नागपूर : शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध भागांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु नागपुरात एकही खड्डा दिसत नाही, असा माहितीच्या अधिकारातच महानगरपालिकेने असा दावा केला असून मनपाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांत खड्डे पडले असताना माहितीच्या अधिकारातून मनपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे.शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार शहराच्या हद्दीत असलेल्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम ‘हॉट मिक्स प्लँन्ट मशीन’च्या आधारे नियमितपणे करण्यात येते. परंतु शहरात तर अनेक ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. महानगरपालिका प्रशासनाचे त्याच्याकडे बहुधा लक्ष गेलेले नाही. दरम्यान, विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केल्यानंतर ते बुजविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेचीच असते खड्डे न बुजविल्यामुळे रिलायन्स जियो इन्फोकॉम लि. यांच्याकडून २ कोटी १८ लाख १५ हजार ५५२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असेदेखील माहितीमध्ये नमूद आहे.(प्रतिनिधी)नागरिकांद्वारे प्राप्त झाल्या केवळ १४ तक्रारीशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात शहरातील नागरिकांकडून रोज ओरड करण्यात येते. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. परंतु मनपाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१३ ते २० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत केवळ १४ नागरिकांनीच तक्रारी दाखल केल्या आहेत. मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक यांच्याकडून ४२७ तक्रारी प्राप्त झाल्या तर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी १८७ तक्रारी केल्या. अधिकारी हवेत उडतात का ?नागपूर शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. परंतु मनपाने दिलेल्या अधिकृत उत्तरात एकही खड्डा नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटारडा तर आहेच. यामागे मनपातील भ्रष्टाचार कारणीभूत आहे की अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुधा मनपाचे अधिकारी थेट हवेतूनच प्रवास करत असावेत. म्हणूनच की काय शहरात एकही खड्डा नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे..