शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कोरोना कमी होण्यामागे ‘हर्ड इम्युनिटी’ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मागील १२ दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या १५ ते २५ दरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मागील १२ दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या १५ ते २५ दरम्यान दिसून येत आहे. मृत्यूची संख्याही दोनच्या आत आहे. यामुळे नागपूरकरांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र तज्ज्ञांनी याला नाकारले आहे. व्यापक लसीकरण नसल्यास व विषाणूत बदल झाल्यास पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेला हैराण केले होते. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले होते. जानेवारी ते जून यादरम्यान तब्बल ३ लाख ५३ हजार २८५ नवे रुग्ण आढळून आले. परंतु त्यातुलनेत लक्षणे नसलेल्या म्हणजे, नकळत कोरोना होऊन गेलेल्यांचे प्रमाण मोठे होते. नुकत्याच झालेल्या लहान मुलांमधील लसीकरणाच्या मानवी चाचणीत १०० पैकी १८ टक्के मुलांमध्ये ‘अ‍ॅण्टिबॉडीज’ वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ४ जुलैपासून ते आतापर्यंत रोजची रुग्णसंख्या २५ च्या आत आहे. मागील १२ दिवसापैकी सहा दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही. यावरून नागपूरकरांमध्ये मोठ्या संख्येत ‘हर्ड इम्युनिटी’ वाढली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

-‘हर्ड इम्युनिटी’मुळे दुसरी लाट ओसरली असे नाही - डॉ. देशमुख

प्रसिद्ध वरिष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोनाची पहिली व दुसरी लाट अचानक वर जाऊन झपाट्याने खाली आली आहे. यामुळे लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाली म्हणून लाट ओसरली, असे म्हणता येणार नाही. कोरोनाच्या अशा लाटा येतच राहणार आहे. मात्र, याची तीव्रता विषाणूतील बदल व लसीकरणावर अवलंबून असणार आहे. जेवढे जास्त लसीकरण तेवढा कोरोनाचा प्रभाव कमी राहणार आहे.

- ७० टक्के लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ नाहीच - डॉ. तायडे

प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, ७० टक्के लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाल्यावरच कोरोनासारख्या विषाणूचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. मात्र, कोरोना विषाणूमध्ये होत असलेल्या बदलांमुळे याची शक्यता फार कमी आहे. सध्यातरी तसे दिसून येत नाही. कोरोनाची लाट येत राहणार आहे. त्याची गंभीरता कमी करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.

-विषाणूचा प्रभाव कमी झाल्याने रुग्ण कमी - डॉ. अरबट

प्रसिद्ध श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाल्याने कोरोनाचा प्रभाव कमी झाला, असे म्हणता येणार नाही. विषाणूचा प्रभाव कमी झाल्याने रुग्णसंख्या वाढत नसल्याचे त्यामागील कारण असावे. विषाणूत बदल झाल्यास किंवा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ आल्यास पुन्हा आपल्याकडे रुग्ण वाढू शकतील. यावर उपाय म्हणजे, व्यापक लसीकरण हाच आहे.

:: महिनानिहाय कोरोनाचे रुग्ण

जानेवारी : १०,५०७

फेब्रुवारी : १५,५१४

मार्च : ७६,२५०

एप्रिल : १,८१,७४९

मे : ६६,८१८

जून : २,४४७

१५ जुलैपर्यंत : ३६१