शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

युद्धाच्या वेळी भीती नसते, शत्रूला संपविणे हेच लक्ष्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

निशांत वानखेडे नागपूर : युद्धाच्या वेळी शत्रूकडून फायरिंग सुरू असताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला जाताे. ...

निशांत वानखेडे

नागपूर : युद्धाच्या वेळी शत्रूकडून फायरिंग सुरू असताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला जाताे. मात्र एकदा सीमेवर गेले की ‘भीती’ नावाचा शब्दच नाहीसा हाेताे. शत्रू समाेर असला की रक्त आपाेआप सळसळते. समाेरच्या शत्रूला संपवायचे किंवा देशासाठी बलिदान करायचे, हा एकच ध्यास मनात असताे आणि कारगिल युद्धाच्या वेळीही तेच ध्येय हाेते. काटाेलचे रहिवासी नायक रत्नाकर ठाकरे यांच्याकडून युद्धाचा थरार ऐकताना अंगावर काटा उभा राहिला.

मूळचे मराठा बटालियनचे असलेले नायक ठाकरे त्यावेळी द्रास सेक्टरला पाेस्टिंगवर हाेते. विविध बटालियनमधून निवडलेल्यांच्या टीममध्ये त्यांचाही समावेश हाेता. ४ मे राेजी हालचाली हाेत असल्याची माहिती मिळाली व २० मेपर्यंत चित्र स्पष्ट हाेत गेले. द्रास सेक्टरमध्ये आम्ही तैनात झालाे. सुरुवातीलाच मनजित सिंह हा अवघ्या १८ वर्षाचा तरुण शहीद झाला हाेता. त्यामुळे प्रत्येकाचे रक्त खवळले हाेते. वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा करायची आणि समाेर कूच करत जायचे, हे सत्र चालले हाेते. समाेरून पाकिस्तानी सैन्याची फायरिंग सुरू असायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचाे. दिवसभर एका ठिकाणी बसून रेकी करायची आणि रात्रीच्या किर्र अंधारात कूच करायची. ५३ दिवस हा लढा चालला हाेता. २६ जुलैला आमच्या जवानांनी टायगर हिल्सवर तिरंगा फडकाविला आणि आमचे ऊर भरून आले. ताे खरेच भावनिक क्षण हाेता. मनात एकच गाणे हाेते, ‘अपनी आझादी काे हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते है लेकीन सर झुका सकते नहीं...’

परतलाे तेव्हा घरच्यांचे ऊर भरून आले

नायक ठाकरे यांच्या लग्नाला अवघी तीन वर्षे झाली हाेती. एक मुलगी हाेती. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर माझी पाेस्टिंग त्यात झाल्याचे समजताच पत्नी बेशुद्ध पडली हाेती. गावकऱ्यांनी तिला समजावले. मात्र हा संपूर्ण काळ कुटुंबासाठी कठीण हाेता. त्यावेळी पत्रव्यवहार हाच आधार हाेता. युद्धाच्या काळात तेही कमी झाले. ‘मी बरा आहे, तुम्ही काळजी घ्या’, एवढेच शब्द सुचायचे. युद्ध संपल्यावर १२ ऑगस्टला घरी परतलाे तेव्हा घरच्यांचा ऊर भरून आला हाेता. चिमुकलीला डाेळा भरून बघितले. गावकऱ्यांनी जल्लाेषात स्वागत केले. माझ्या हस्ते झेंडा फडकविला गेला. यापेक्षा माेठा अभिमान एका सैनिकासाठी काय असताे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.