शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

येचुरींच्या प्रवास खर्चावर एकही पैसा खर्च नाही

By admin | Updated: March 23, 2017 02:21 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द होऊन

आगलावेंचा दावा : पाहुण्यांच्या विमान तिकिटासाठी लेखी परवानगीची गरज नाही नागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द होऊन आठवडा लोटला असला तरी अद्यापही वातावरण तापलेलेच आहे. कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता नसल्याने येचुरींचे विमान तिकीट कुणी काढले, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला होता. मात्र येचुरी यांच्या प्रवासखर्चावर विद्यापीठाचा एकही रुपया खर्च झालेला नाही. शिवाय अध्यासनाच्या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांच्या विमान तिकिटासाठी लेखी परवानगीची आवश्यकता नाही, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे. विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र प्रशासकीय परवानगीच घेतली नसल्याच्या कारणावरुन संबंधित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. सीताराम येचुरी यांनी नागपुरात आल्यानंतर यासंदर्भात टीका केली व विद्यापीठाने मला एक महिना अगोदर तिकीट का पाठविले असा प्रश्न उपस्थित केला. संबंधित कार्यक्रमाचे आयोजन व पाहुण्यांना विमानाची तिकिटे पाठविणे यासाठी माझी लेखी परवानगी घेण्यात आली नव्हती. मग येचुरी यांना तिकीट कुणी पाठविले, असा प्रतिप्रश्न कुलगुरूंनी केला होता. याबाबत डॉ.आगलावे यांना विचारणा केली असता संबंधित कार्यक्रम हा अध्यासनांतर्गत येत होता व सामाजिक न्याय विभागातर्फे त्यासाठी निधी देण्यात आला होता. यात पाहुण्यांच्या प्रवासखर्चाचादेखील समावेश असतो. म्हणून पाहुण्यांच्या विमानतिकिटासाठी लेखी परवानगी घेण्याची आवश्यकताच नव्हती, असा दावा डॉ.आगलावे यांनी केला.(प्रतिनिधी) येचुरी यांनी दिले तिकिटाचे पैसे सीताराम येचुरी यांचे दिल्ली ते नागपूर असे विमानाचे तिकीट काढण्यात आले होते. तसेच त्यांचे परतीचेदेखील तिकीट होते. मात्र कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे परतीचे तिकीट रद्द करण्यात आले. येचुरी यांना नागपुरातून हैदराबादला जायचे होते. त्यामुळे ऐनवेळी तिकीट रद्द करू नका. दिल्लीहून मी त्याच तिकीटावर नागपूरला येतो व त्याचे पैसे देतो, अशी विनंती येचुरी यांनी केली होती.नागपुरात आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली-नागपूर विमानतिकीटाचे पैसे दिले. त्यामुळे विद्यापीठाचा एकही रुपया खर्च झाला नाही, असे डॉ.आगलावे यांनी सांगितले. याबाबतचे सर्व लेखी पुरावे उपलब्ध असून ते कुणालाही दाखवायला तयार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम दीक्षांत सभागृहात कसा ? डॉ.आगलावे यांनी कुलगुरूंची लेखी परवानगी घेतल्याचा दावा केला, तर कुलगुरुंनी याचा इन्कार केला आहे. दीक्षांत सभागृहात विविध व्याख्यानमालांचे आयोजन व्हायचे. काही मोजक्या वगळल्या तर सर्व व्याख्यानमाला शैक्षणिक विभागातच घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. कुठल्या विभागाच्या सेमिनार किंवा परिषदेसाठी दीक्षांत सभागृह दिले जात नाही. मग अशा स्थितीत जर कुलगुरूंची परवानगीच नव्हती तर दीक्षांत सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या पत्रिका कशा काय छापण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.