शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची गरज

By admin | Updated: March 30, 2015 02:35 IST

विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही.

नागपूर : विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही. देशातील ४० टक्के धरण महाराष्ट्र राज्यात असले तरी ८२ टक्के शेती कोरडवाहूच आहे. यामुळेच जलसिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तिरपुडे महाविद्यालयातर्फे या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी पुढाकार घेण्यात आला.तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील ठवरे सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता झालेल्या झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भावना व्यक्त केल्या. विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारण तसेच उपाय यांची माहिती आहे. परंतु दुर्दैवाने त्या दिशेने वेगाने समोर जाणे आपल्याला शक्य झालेले नाही. राज्याचा अर्थसंकल्प ६० हजार कोटींचा आहे परंतु राज्यात ७५ हजार कोटी रुपयांच्या योजना अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मराठवाडा व विदर्भातील ज्या योजना लवकर पूर्ण होऊ शकतात, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विदर्भातील त्याचप्रमाणे मराठवड्यातील कृषीपंपांचा ‘बॅकलॉग’देखील भरून काढणार असून यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सौरपंपांचेदेखील वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित पुस्तकामध्ये तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या सूचनांचा राज्य शासनाकडून अभ्यास करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वनिता तिरपुडे, महासचिव वामनराव कोंबाडे, प्राचार्य डॉ.केशव पाटील, उपाध्यक्ष डॉ.टी.व्ही.गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी पुस्तकाची रूपरेषा मांडली. महेश गौतम यांनी संचालन यांनी केले. तर मधुकर उईके यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)