शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची गरज

By admin | Updated: March 30, 2015 02:35 IST

विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही.

नागपूर : विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही. देशातील ४० टक्के धरण महाराष्ट्र राज्यात असले तरी ८२ टक्के शेती कोरडवाहूच आहे. यामुळेच जलसिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तिरपुडे महाविद्यालयातर्फे या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी पुढाकार घेण्यात आला.तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील ठवरे सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता झालेल्या झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भावना व्यक्त केल्या. विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारण तसेच उपाय यांची माहिती आहे. परंतु दुर्दैवाने त्या दिशेने वेगाने समोर जाणे आपल्याला शक्य झालेले नाही. राज्याचा अर्थसंकल्प ६० हजार कोटींचा आहे परंतु राज्यात ७५ हजार कोटी रुपयांच्या योजना अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मराठवाडा व विदर्भातील ज्या योजना लवकर पूर्ण होऊ शकतात, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विदर्भातील त्याचप्रमाणे मराठवड्यातील कृषीपंपांचा ‘बॅकलॉग’देखील भरून काढणार असून यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सौरपंपांचेदेखील वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित पुस्तकामध्ये तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या सूचनांचा राज्य शासनाकडून अभ्यास करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वनिता तिरपुडे, महासचिव वामनराव कोंबाडे, प्राचार्य डॉ.केशव पाटील, उपाध्यक्ष डॉ.टी.व्ही.गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी पुस्तकाची रूपरेषा मांडली. महेश गौतम यांनी संचालन यांनी केले. तर मधुकर उईके यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)