शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

सिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची गरज

By admin | Updated: March 30, 2015 02:35 IST

विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही.

नागपूर : विदर्भात पाण्याची कमतरता नाही, परंतु नद्यांमधील पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यात अजून हवे तसे यश आलेले नाही. देशातील ४० टक्के धरण महाराष्ट्र राज्यात असले तरी ८२ टक्के शेती कोरडवाहूच आहे. यामुळेच जलसिंचनाच्या नियोजनात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तिरपुडे महाविद्यालयातर्फे या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी पुढाकार घेण्यात आला.तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील ठवरे सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता झालेल्या झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भावना व्यक्त केल्या. विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारण तसेच उपाय यांची माहिती आहे. परंतु दुर्दैवाने त्या दिशेने वेगाने समोर जाणे आपल्याला शक्य झालेले नाही. राज्याचा अर्थसंकल्प ६० हजार कोटींचा आहे परंतु राज्यात ७५ हजार कोटी रुपयांच्या योजना अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मराठवाडा व विदर्भातील ज्या योजना लवकर पूर्ण होऊ शकतात, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विदर्भातील त्याचप्रमाणे मराठवड्यातील कृषीपंपांचा ‘बॅकलॉग’देखील भरून काढणार असून यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सौरपंपांचेदेखील वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित पुस्तकामध्ये तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या सूचनांचा राज्य शासनाकडून अभ्यास करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वनिता तिरपुडे, महासचिव वामनराव कोंबाडे, प्राचार्य डॉ.केशव पाटील, उपाध्यक्ष डॉ.टी.व्ही.गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी पुस्तकाची रूपरेषा मांडली. महेश गौतम यांनी संचालन यांनी केले. तर मधुकर उईके यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)