शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला भाव नाही, नुकसानीच्या झळा सोसणारा शेतकरी आत्महत्या करतोय

By जितेंद्र ढवळे | Updated: October 23, 2023 16:47 IST

यवतमाळमध्ये ४६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अनिल देशमुख यांची सरकारवर टीका

नागपूर : सरकार पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेला शेतकरी कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करतोय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आ. अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. आघाडी सरकार असताना कापसाला १२ हजार रुपये भाव मिळाला. आता कापसाला ७ हजारही भाव मिळत नाही. अशात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. दुसरीकडे विविध रोगांमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. मात्र, बाजारात सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते; पण, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करताहेत. यवतमाळ जिल्ह्यात २०२२ मध्ये २७२ तर सप्टेंबर-२०२३ पर्यंत १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार शेतकरी आत्महत्येवर गप्प का, असा सवाल देशमुख यांनी याप्रसंगी केला.

देशात भाव नसताना कापसावर जे ११ टक्के आयात शुल्क होते ते माफ करून जवळपास १६ लाख गाठी विदेशातून आयात का करण्यात आल्या, असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.वर्षा निकम, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारूक, जि.प.सदस्य सलील देशमुख उपस्थित होते.

सरकारची मदत कागदावरचराज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी १ हजार ७१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.