शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कापसाला भाव नाही, नुकसानीच्या झळा सोसणारा शेतकरी आत्महत्या करतोय

By जितेंद्र ढवळे | Updated: October 23, 2023 16:47 IST

यवतमाळमध्ये ४६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अनिल देशमुख यांची सरकारवर टीका

नागपूर : सरकार पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेला शेतकरी कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करतोय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आ. अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. आघाडी सरकार असताना कापसाला १२ हजार रुपये भाव मिळाला. आता कापसाला ७ हजारही भाव मिळत नाही. अशात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. दुसरीकडे विविध रोगांमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. मात्र, बाजारात सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते; पण, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करताहेत. यवतमाळ जिल्ह्यात २०२२ मध्ये २७२ तर सप्टेंबर-२०२३ पर्यंत १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार शेतकरी आत्महत्येवर गप्प का, असा सवाल देशमुख यांनी याप्रसंगी केला.

देशात भाव नसताना कापसावर जे ११ टक्के आयात शुल्क होते ते माफ करून जवळपास १६ लाख गाठी विदेशातून आयात का करण्यात आल्या, असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.वर्षा निकम, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारूक, जि.प.सदस्य सलील देशमुख उपस्थित होते.

सरकारची मदत कागदावरचराज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी १ हजार ७१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.