शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कापसाला भाव नाही, नुकसानीच्या झळा सोसणारा शेतकरी आत्महत्या करतोय

By जितेंद्र ढवळे | Updated: October 23, 2023 16:47 IST

यवतमाळमध्ये ४६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अनिल देशमुख यांची सरकारवर टीका

नागपूर : सरकार पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेला शेतकरी कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करतोय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आ. अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. आघाडी सरकार असताना कापसाला १२ हजार रुपये भाव मिळाला. आता कापसाला ७ हजारही भाव मिळत नाही. अशात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. दुसरीकडे विविध रोगांमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. मात्र, बाजारात सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते; पण, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करताहेत. यवतमाळ जिल्ह्यात २०२२ मध्ये २७२ तर सप्टेंबर-२०२३ पर्यंत १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार शेतकरी आत्महत्येवर गप्प का, असा सवाल देशमुख यांनी याप्रसंगी केला.

देशात भाव नसताना कापसावर जे ११ टक्के आयात शुल्क होते ते माफ करून जवळपास १६ लाख गाठी विदेशातून आयात का करण्यात आल्या, असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.वर्षा निकम, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारूक, जि.प.सदस्य सलील देशमुख उपस्थित होते.

सरकारची मदत कागदावरचराज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी १ हजार ७१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.