शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गडचिरोली जिल्ह्यातील ८२९ गावात इंटरनेटच नाही, कसे घडणार महाराष्ट्राचे भविष्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 21:03 IST

Nagpur News देश डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करीत असताना राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात मात्र, ८२९ पेक्षा अधिक गावांमध्ये अद्याप इंटरनेट पोहोचले नाही.

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षणापासून मुले वंचित उत्तर सादर करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

नागपूर : देश डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करीत असताना राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात मात्र, ८२९ पेक्षा अधिक गावांमध्ये अद्याप इंटरनेट पोहोचले नाही. सध्या कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. या स्थितीत संबंधित गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब अतिशय गंभीरतेने घेऊन, या गावांमध्ये इंटरनेटची सुविधा का उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा सवाल राज्य सरकारला विचारला आणि यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र ॲड. फिरदौस मिर्झा यांनी केंद्रीय दूरसंचार विभागाच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधून, गडचिरोली जिल्ह्यातील ८२९ पेक्षा अधिक गावांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याचे सांगितले. याशिवाय शिक्षण हक्क कायदा व अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचीही माहिती दिली.

या कायद्यानुसार, विद्यार्थ्यांना नियमित मध्यान्ह भोजन पुरविणे आवश्यक आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणामुळे काही ठिकाणी मध्यान्ह भोजन दिले जात नाही. तसेच या योजनेचे अनुदानही थांबविण्यात आले आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. परिणामी, न्यायालयाने राज्य सरकारला यावरही स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. २०२० मध्ये गडचिरोली येथील १० शालेय विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून ऑनलाईन शिक्षण व मध्यान्ह भोजन उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

एकीकडे कोरोनामुळे शाळा बंद आहेत आणि दुसरीकडे संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधाही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत राज्यातील या भावी पिढीच्या भविष्याचे काय होईल, याची कल्पना केली जाऊ शकते, असे निरीक्षण न्यायालयाने हा आदेश देताना नोंदविले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय