शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:47 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.

ठळक मुद्देपंखे नसल्याने मतदार उकाड्याने त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी येथील पेन्शननगर प्राथमिक शाळेत मतदानाचे चार बूथ होते. या केंद्रावर दुपारी १२ च्या सुमारास मतदानासाठी लांब रांग लागली होती. दोन-अडीच तास नागरिक रांगेत उभे होते. उन्हामुळे पाण्यासाठी मतदार भटकत होते. येथे पिण्याच्या पाण्याची, शौचालय व पंखे यापैकी कोणतही सुविधा नव्हती. यामुळे रांगेत उभे असलेले नागरिक घामाघूम झाले होते. 

झिंगाबाई टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मतदान केंद्र होते. जागा कमी असल्याने गर्दी झाल्याने मतदारांची रांग रस्त्यापर्यत आली होती. दुपारच्या उन्हात मतदार रांगेत होते. येथे सावलीची व्यवस्था केली नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. यामुळे नागरिक त्रासले होते.सिव्हील लाईन्स भागातील बिजलीनगर येथील महापालिकेच्या कलादालनात मतदान केंद्र होते. येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. मतदान केंद्राबाहेर पोलीस कर्मचारी व बूथवरील कार्यकर्ते उन्हातच होते. सावलीची व्यवस्था केली नव्हती. सिव्हील लाईन्स भागातील युगांतर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मतदान केंद्र होते. या केंद्रावरही पिण्याचे पाणी व सावलीची व्यवस्था नव्हती. सुरेंद्रगड येथील महापालिका शाळेत मतदान केंद्र होते. या केंद्रावर पिण्यासाठी पाणी नव्हते. 
मोमीनपुरा भागातील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत महिला मतदारांनी दुपारी मतदानासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत प्रकाश अंधुक होता. लाईटची व्यवस्था नव्हती. निमुळती जागा असल्याने हवा खेळती नव्हती. त्यातच पंखे नसल्याने मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिला घामाघूम झाल्या होत्या. विशेष म्हणजे या केंद्रावरही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. उकाड्यामुळे त्रस्त झाल्याने अनेक जण मतदान न करता परत जात होते. सुविधा नसल्याने नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019