शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:47 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.

ठळक मुद्देपंखे नसल्याने मतदार उकाड्याने त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी येथील पेन्शननगर प्राथमिक शाळेत मतदानाचे चार बूथ होते. या केंद्रावर दुपारी १२ च्या सुमारास मतदानासाठी लांब रांग लागली होती. दोन-अडीच तास नागरिक रांगेत उभे होते. उन्हामुळे पाण्यासाठी मतदार भटकत होते. येथे पिण्याच्या पाण्याची, शौचालय व पंखे यापैकी कोणतही सुविधा नव्हती. यामुळे रांगेत उभे असलेले नागरिक घामाघूम झाले होते. 

झिंगाबाई टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मतदान केंद्र होते. जागा कमी असल्याने गर्दी झाल्याने मतदारांची रांग रस्त्यापर्यत आली होती. दुपारच्या उन्हात मतदार रांगेत होते. येथे सावलीची व्यवस्था केली नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. यामुळे नागरिक त्रासले होते.सिव्हील लाईन्स भागातील बिजलीनगर येथील महापालिकेच्या कलादालनात मतदान केंद्र होते. येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. मतदान केंद्राबाहेर पोलीस कर्मचारी व बूथवरील कार्यकर्ते उन्हातच होते. सावलीची व्यवस्था केली नव्हती. सिव्हील लाईन्स भागातील युगांतर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मतदान केंद्र होते. या केंद्रावरही पिण्याचे पाणी व सावलीची व्यवस्था नव्हती. सुरेंद्रगड येथील महापालिका शाळेत मतदान केंद्र होते. या केंद्रावर पिण्यासाठी पाणी नव्हते. 
मोमीनपुरा भागातील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत महिला मतदारांनी दुपारी मतदानासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत प्रकाश अंधुक होता. लाईटची व्यवस्था नव्हती. निमुळती जागा असल्याने हवा खेळती नव्हती. त्यातच पंखे नसल्याने मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिला घामाघूम झाल्या होत्या. विशेष म्हणजे या केंद्रावरही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. उकाड्यामुळे त्रस्त झाल्याने अनेक जण मतदान न करता परत जात होते. सुविधा नसल्याने नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019