शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:47 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.

ठळक मुद्देपंखे नसल्याने मतदार उकाड्याने त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी येथील पेन्शननगर प्राथमिक शाळेत मतदानाचे चार बूथ होते. या केंद्रावर दुपारी १२ च्या सुमारास मतदानासाठी लांब रांग लागली होती. दोन-अडीच तास नागरिक रांगेत उभे होते. उन्हामुळे पाण्यासाठी मतदार भटकत होते. येथे पिण्याच्या पाण्याची, शौचालय व पंखे यापैकी कोणतही सुविधा नव्हती. यामुळे रांगेत उभे असलेले नागरिक घामाघूम झाले होते. 

झिंगाबाई टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मतदान केंद्र होते. जागा कमी असल्याने गर्दी झाल्याने मतदारांची रांग रस्त्यापर्यत आली होती. दुपारच्या उन्हात मतदार रांगेत होते. येथे सावलीची व्यवस्था केली नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. यामुळे नागरिक त्रासले होते.सिव्हील लाईन्स भागातील बिजलीनगर येथील महापालिकेच्या कलादालनात मतदान केंद्र होते. येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. मतदान केंद्राबाहेर पोलीस कर्मचारी व बूथवरील कार्यकर्ते उन्हातच होते. सावलीची व्यवस्था केली नव्हती. सिव्हील लाईन्स भागातील युगांतर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मतदान केंद्र होते. या केंद्रावरही पिण्याचे पाणी व सावलीची व्यवस्था नव्हती. सुरेंद्रगड येथील महापालिका शाळेत मतदान केंद्र होते. या केंद्रावर पिण्यासाठी पाणी नव्हते. 
मोमीनपुरा भागातील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत महिला मतदारांनी दुपारी मतदानासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत प्रकाश अंधुक होता. लाईटची व्यवस्था नव्हती. निमुळती जागा असल्याने हवा खेळती नव्हती. त्यातच पंखे नसल्याने मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिला घामाघूम झाल्या होत्या. विशेष म्हणजे या केंद्रावरही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. उकाड्यामुळे त्रस्त झाल्याने अनेक जण मतदान न करता परत जात होते. सुविधा नसल्याने नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019