शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

देशातील मूलभूत परिवर्तनाला दिशा मिळते आहे

By admin | Updated: July 5, 2015 03:03 IST

सध्या भारत एका संक्रमणातून जात आहे. जागतिक पातळीवर देशाची स्थिती बदलते आहे कारण नागरिक सुजाण होत आहेत.

नागपूर : सध्या भारत एका संक्रमणातून जात आहे. जागतिक पातळीवर देशाची स्थिती बदलते आहे कारण नागरिक सुजाण होत आहेत. केवळ राजकारणाच्या भरवशावर राहून देशाचा विकास होणार नाही तर त्यासाठी सजग नागरिकांचा दबावगट निर्माण होणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी राजकारण प्रासंगिक राहिले असले तरी केवळ सत्तेसाठी असलेल्या राजकारणाने नुकसान होण्याचाच संभव आहे पण संघर्ष, विचार निर्माण, चारित्र्य , रचनात्मक कार्य आणि सत्तेवर अंकुश असल्याशिवाय यापुढे राजकारण करता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना या घटकांचा विचार करूनच राजकारण करावे लागते आहे. यातूनच निश्चितपणे मूलभूत परिवर्तनाला आता प्रारंभ झाला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक योगेंन्द्र यादव यांनी व्यक्त केले. जनमंचतर्फे न्या अशोक देसाई स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी ‘२१ व्या शतकातील भारत : नवी दिशा, नवी आव्हाने’ विषयावर योगेन्द्र यादव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे तर प्रमुख अतिथी म्हणून जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, शरद पाटील, राजीव जगताप आणि प्रमोद पांडे उपस्थित होते. यादव यांनी तीन मुद्यांच्या आधारावर २१ व्या शतकातला भारत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले कच्चे दुवेही सांगितले. धर्मनिरपेक्षता, सामाजिक आरक्षण आणि आर्थिक सुधारणा या मुद्यांवर त्यांनी भर दिला. या वादाच्या मुद्यांवर एकमत होत नाही पण देशाच्या हितासाठी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची गरज सध्या सर्वाधिक आहे. २० व्या शतकाचे वैचारिक संचित समजून घेत आपला देश प्रगतिपथावर आहे. धर्मनिरपेक्षता हेच आपल्या देशाचे मूळ आहे आणि विविधता हीच आपली शक्ती आहे. पण धर्मनिरपेक्षतेच्या नावावर अल्पसंख्यांकांना असुरक्षित ठेवण्याचे पाखंड थांबले पाहिजे.जाती आधारीत समाजव्यवस्थेमुळे संधीची असमानता आहेच. ती नाकारता येत नाही. त्यामुळेच आरक्षणाला काहींचा विरोध असला तरी त्याची नितांत गरज आहे सामान्य माणसाला लाभ पोहोचविण्याचा विचार होत नाही. यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रकाश दुबे म्हणाले, राजकीय पक्ष केवळ आश्वासने देतात. ती पाळली जात नाही आणि जनता त्यावरच विचारच करीत नाही त्यामुळे त्यांना जाब विचारण्याचा प्रश्न दूरच आहे. माध्यमांवर विसंबून राहून स्थिती बदलेल, हे दिवास्वप्न आहे. नागरिकांनीच आता सजगतेने समोर येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी जनमंचच्या कार्याची माहिती दिली तर शरद पाटील यांनी या कार्यामागची प्रेरणा सांगितली. संचालन श्वेता शेलगावकर यांनी आणि आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)