शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मागणी आहे, पण वनविभागाचे धोरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:08 IST

नागपूर : वाढते व्याघ्र प्रकल्प, दिवसेंदिवस वाढणारी वन्यप्राण्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे अनेक गावांना पुनर्वसन हवे आहे. ...

नागपूर : वाढते व्याघ्र प्रकल्प, दिवसेंदिवस वाढणारी वन्यप्राण्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे अनेक गावांना पुनर्वसन हवे आहे. गावांनी ग्रामसभेचे ठराव करून वनविभागाला पाठविलेही आहेत. मात्र यासंदर्भात वन विभागाचे निश्चित धोरणच नाही. परिणामत: राज्यातील अनेक गावांना दहशतीच्या वातावरणात दिवस काढावे लागत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर हा प्रश्न पुन्हा बिकट होत आहे.

नव प्रकल्पामध्ये आलेल्या गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

प्रारंभीच्या काळात वनव्याप्त गावातील शेतकरी, नागरिक आपली गावे आणि शेती सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नव्हते. मात्र गावकऱ्यांना पुनर्वसनाचे फायदे लक्षात आल्यावर मानसिकता बदलली. दहा लाख रुपयाच्या पॅकेजसोबत पुनर्वसनाच्या ठिकाणी घर, आरोग्यसुविधा, शाळा, शौचालय मिळत असल्याने हे गावकरी तयार झाले. महत्त्वाचे म्हणजे वन्यजीवापासून असलेली भीती दूर झाल्याने पुनर्वसनाकडे कल वाढला. आता अनेक गावाकडून पुनर्वसानाची मागणी होत असूनही यावर सरकार आणि वन विभाग निर्णय घ्यायला तयार नाही.

अनेक गावाच्या प्रक्रिया संथगतीने सुरू आहेत. मेळघाटमधील २२ गावांपैकी ७ गावे मागील नऊ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. गावाची तयारी आहे. मात्र सरकारने पुनर्वसनासाठी पैसाच दिला नाही. आता कुठे मालूद गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा गावाची अडचण तर यापेक्षा वेगळी आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी निधी आला. परंतु नियमानुसार पुनर्वसानासाठी वन विभागाचीच जागा हवी. त्यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पडून आहे. अद्याप उत्तर आलेले नाही. परवानगीची प्रतीक्षा सुरू आहे. टिपेश्वर अभयारण्यात पिटाकुंभरी हे गाव नव्याने प्रस्तावित झाले आहे.

पेंचमध्ये फुलझरी या गावालाही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.

पॅकेजमुळे आणि वन्यजीवापासून असलेला धोका टळावा यासाठी राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील गावकरी नव्या जागी जाण्यास तयार असले तरी, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने निधी देताना हात आखडता घेतला आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील ६७ गावाचे पुनर्वसन करायचे होते. यातील अनेक गावे अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.

...

कोट

वनालगतच्या ज्या गावाची आदिवासी लोकसंख्या ८० टक्क्यावर आहे, अशा गावांचे पुनर्वसन आदिवासी विभागाच्या योजनेंतर्गत व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक संमती दर्शविली होती. त्यामुळे आता आदिवासी विभागाने ही जबाबदारी उचलावी, सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी.

किशोर रिठे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

...

एनटीसीएकडे मागील वर्षी ४९ कोटी मागितले होते, परंतु एक पैसाही आला नाही. २०१३-१४ मध्ये २०३ कोटीची मागणी केली आहे. निधी न मिळाल्यामुळे पुनर्वसनाचे काम थांबलेले आहे.