शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

मागणी आहे, पण वनविभागाचे धोरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:08 IST

नागपूर : वाढते व्याघ्र प्रकल्प, दिवसेंदिवस वाढणारी वन्यप्राण्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे अनेक गावांना पुनर्वसन हवे आहे. ...

नागपूर : वाढते व्याघ्र प्रकल्प, दिवसेंदिवस वाढणारी वन्यप्राण्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे अनेक गावांना पुनर्वसन हवे आहे. गावांनी ग्रामसभेचे ठराव करून वनविभागाला पाठविलेही आहेत. मात्र यासंदर्भात वन विभागाचे निश्चित धोरणच नाही. परिणामत: राज्यातील अनेक गावांना दहशतीच्या वातावरणात दिवस काढावे लागत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर हा प्रश्न पुन्हा बिकट होत आहे.

नव प्रकल्पामध्ये आलेल्या गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

प्रारंभीच्या काळात वनव्याप्त गावातील शेतकरी, नागरिक आपली गावे आणि शेती सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नव्हते. मात्र गावकऱ्यांना पुनर्वसनाचे फायदे लक्षात आल्यावर मानसिकता बदलली. दहा लाख रुपयाच्या पॅकेजसोबत पुनर्वसनाच्या ठिकाणी घर, आरोग्यसुविधा, शाळा, शौचालय मिळत असल्याने हे गावकरी तयार झाले. महत्त्वाचे म्हणजे वन्यजीवापासून असलेली भीती दूर झाल्याने पुनर्वसनाकडे कल वाढला. आता अनेक गावाकडून पुनर्वसानाची मागणी होत असूनही यावर सरकार आणि वन विभाग निर्णय घ्यायला तयार नाही.

अनेक गावाच्या प्रक्रिया संथगतीने सुरू आहेत. मेळघाटमधील २२ गावांपैकी ७ गावे मागील नऊ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. गावाची तयारी आहे. मात्र सरकारने पुनर्वसनासाठी पैसाच दिला नाही. आता कुठे मालूद गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा गावाची अडचण तर यापेक्षा वेगळी आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी निधी आला. परंतु नियमानुसार पुनर्वसानासाठी वन विभागाचीच जागा हवी. त्यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पडून आहे. अद्याप उत्तर आलेले नाही. परवानगीची प्रतीक्षा सुरू आहे. टिपेश्वर अभयारण्यात पिटाकुंभरी हे गाव नव्याने प्रस्तावित झाले आहे.

पेंचमध्ये फुलझरी या गावालाही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.

पॅकेजमुळे आणि वन्यजीवापासून असलेला धोका टळावा यासाठी राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील गावकरी नव्या जागी जाण्यास तयार असले तरी, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने निधी देताना हात आखडता घेतला आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील ६७ गावाचे पुनर्वसन करायचे होते. यातील अनेक गावे अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.

...

कोट

वनालगतच्या ज्या गावाची आदिवासी लोकसंख्या ८० टक्क्यावर आहे, अशा गावांचे पुनर्वसन आदिवासी विभागाच्या योजनेंतर्गत व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक संमती दर्शविली होती. त्यामुळे आता आदिवासी विभागाने ही जबाबदारी उचलावी, सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी.

किशोर रिठे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

...

एनटीसीएकडे मागील वर्षी ४९ कोटी मागितले होते, परंतु एक पैसाही आला नाही. २०१३-१४ मध्ये २०३ कोटीची मागणी केली आहे. निधी न मिळाल्यामुळे पुनर्वसनाचे काम थांबलेले आहे.