शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी परीक्षांच्या नियोजनात सातत्याने होतोय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नागपूर : राज्यात आरोग्य विभाग सहा हजारांवर पदांच्या भरती घेणार असलेली परीक्षा ऐनवेळी रद्द केली. सरकारद्वारे घेण्यात ...

नागपूर : राज्यात आरोग्य विभाग सहा हजारांवर पदांच्या भरती घेणार असलेली परीक्षा ऐनवेळी रद्द केली. सरकारद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत वाढत असलेला गोंधळ हा पहिल्यांदाच झाला नाही. २०१० नंतर सरकारने परीक्षेच्या आयोजनात कंत्राटदार कंपन्यांवर जबाबदारी टाकून हात वर केल्याने ऐनवेळी परीक्षा रद्द होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परीक्षांच्या आयोजनात आऊटसोर्सिंग बंद करण्याची व सरकारी परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी आता विद्यार्थी संघटनांकडून व्हायला लागली आहे.

२०१० पूर्वी राज्यातील सरकारी निवड प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फत घेतली जायची. दुय्यम सेवा निवड मंडळाच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होत्या. परीक्षेसंदर्भातील जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित होत होती. परंतु, गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध वाढल्याने सरकारी संस्थांकडून परीक्षेची प्रक्रिया करून न घेता कंत्राटदाराच्या माध्यमातून सरकारी परीक्षा घेण्यात येत आहेत.

आऊटसोर्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत झाले घोटाळे

२०१८-१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कर निर्धारण अधिकारी गट ब आणि क, तलाठी तसेच एसआयडी विशेष गुप्त वार्ता अधिकारी या पदांवर महापोर्टलद्वारे भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्यामध्ये बरेच विद्यार्थी गैरव्यवहार करून पास झाले. ते नोकरीवर रुजू झाल्यानंतर सर्व घोटाळे उघडकीस आले. २०१९ मध्ये सुद्धा ग्रुप-सी व डी च्या वेगवेगळ्या विभागातील पदाच्या भरती घेण्यात आल्या होत्या. त्यातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले.

राज्य परीक्षा मंडळाकडून घ्यावे धडे

राज्य शिक्षण मंडळ कित्येक वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे यशस्वी आयोजन करते. लाखोच्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात. महिनाभर पेपर होत असतात. पण मंडळाचे सुक्ष्म नियोजन आणि नियंत्रण असल्याने कुठलाही घोळ होत नाही. शैक्षणिक परीक्षेत इतके उत्तम नियोजन मंडळ करते. मग सरकार नोकरी देत असताना एवढा गोंधळ का वाढविते, असा सवाल विद्यार्थी संघटनांचा आहे.

एमपीएसईच्या समर्थनात विद्यार्थी संघटनांचे अभियान

स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेद्वारे सरकारी परीक्षेचे आयोजन एमपीएसईद्वारेच करण्यात यावे, यासाठी ऑनलाईन अभियान राबविण्यात येत आहे. संघटनेचे अध्यक्ष उमेश कोराम यांचे म्हणणे आहे की, एमपीएसईने स्वत: सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्रव्यवहार केला आहे की या परीक्षा घेण्यास आम्ही तयार आहोत. सरकारी यंत्रणा परीक्षा घेण्यास तयार आहे, तरीही सरकार आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून परीक्षेच्या आयोजनात अट्टहास करीत आहे.

एमपीएसईद्वारे का घ्याव्यात परीक्षात

१) एमपीएसईद्वारे परीक्षेचे आयोजन पारदर्शी पद्धतीने होते

२) जिल्हा यंत्रणेचे लक्ष परीक्षेवर असते.

३) जिल्हा ट्रेझरीच्या कंट्रोलरूममध्ये पेपर असतात.

४) परीक्षेच्या आयोजनात तज्ज्ञांचा समावेश असतो

५) अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येतात

६) अधिकाऱ्यांवर धाक असतो

७) २० वर्षांत एकाही विद्यार्थ्याचा परीक्षेच्या आयोजनात आक्षेप नाही.

- खऱ्या अर्थाने प्रक्रिया राबवायची झाल्यास ती महाराष्ट्र सरकारच्या एमपीएसई आयोग किंवा तत्सम सरकारी विभाग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात यावी. जेणेकरून अधिकारी / कर्मचारी नियमाने कार्य करण्यास बाध्य राहतील. सरकारच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेस आहेत. बऱ्याच प्रिंटिंग प्रेस ह्या तुरुंगातून चालविल्या जातात. एवढी मोठी यंत्रणा असूनसुद्धा कंत्राटदारांना कंत्राट देऊन सरकार गोंधळ वाढवीत आहे.

आशिष फुलझेले, सदस्य, मानव अधिकार संरक्षण मंच