शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

 लाखाच्या संख्येत असणाऱ्या धानाच्या प्रजाती आता अवघ्या ६ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 07:24 IST

Nagpur News सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी देशात धानाच्या १ लाख १० हजार प्रजाती होत्या. मात्र आता यातील अनेक नामशेष झाल्या असून असून देशभरात अवघ्या ६ हजारांपर्यंतच धानाच्या देशी जाती अस्तीत्वात आहे.

ठळक मुद्देदेशी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर विदर्भात उरल्या फक्त २० जाती

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी देशात धानाच्या १ लाख १० हजार प्रजाती होत्या. मात्र आता यातील अनेक नामशेष झाल्या असून असून देशभरात अवघ्या ६ हजारांपर्यंतच धानाच्या देशी जाती अस्तीत्वात आहे. यामुळे या जातींचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन न झाल्यास निसर्गाच्या मोठ्या अलौंकिक देणगीला मुकण्याची वेळ माणसावर येण्याची शक्यता आहे.

१०७०-७५ च्या दशकात संकरित बियाण्यांची पद्धत नव्हती. सर्व प्रकारचे देशी वाण शेतामध्ये पिकवले जायचे. मात्र हरित क्रांतीनंतर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. देशाच्या कृषी उत्पादकता वाढीवर भर दिला गेला. नवे वाण संशोधनासोबतच देशात प्रयोगाशाळा उभ्या झाल्या. कृषी विद्यापिठांमधून संशोधित वाण बाहेर आल्याने शेतकरी नव्या वाणाकडे वळले. देशामध्ये रोजच्या जेवणात भाताचा वापर अधिक आहे. सध्या महाराष्ट्रात विदर्भ व कोकणसह, अन्य राज्यात फक्त ५ ते ६ हजार धानाच्या जाती उरल्या आहेत.

विदर्भात उरल्या २० जाती

विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिलह्यांमध्येही पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे तांदुळ पिकविले जायचे. मात्र आता विदर्भात फक्त २० जाती उरल्या आहेत. यात लुचई, पांढरी लुचई, पिवळी लुचई, काली कम्मोर, हिरानथी (तुळशीमंजुळा), दुबराज, काटेचिन्नोर, चिन्नोर, बासगिरा, गुरूमुखिया, लिलावती, काला भात, रक्तसाळ आदी जाती उरल्या आहेत. २०१४ पासून देशी वाण संकलित करण्याच्या महाराष्ट्र जनकोष प्रकल्पांच्या माध्यमातून उपक्रमाला चालना मिळायला लागल्याने काही मोजके शेतकरी या वाणांच्या लागवडीकडे आणि संवर्धनाकडे वळले आहे.

जीएमओने आणली गदा

मुळ वाणावर संशोधन करून नवे संकरित वाण बाजारात आणल्याने व त्याची उत्पदकता अधिक असल्याने शेतकरी मुळ वाणाला विसरले. जीएमओ अर्थात जणुकिय परावर्तीत पिके (जेनेटिकली मॉडिफाईट सीड्‌स) घेण्याकडे कल वाढला. सरकारकडून आणि बियाणे विक्रेत्या कंपन्याकडूनही यासाठी शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळायला लागल्याने नव्या संकरित वाणाचा वापर वाढला. पूर्वी प्रचलित असणारे वाण कमी उत्पादकतेचे होते. मात्र त्यात नैसर्गिक घटक, खनिजे होती. परंतु अधिक उत्पादकतेच्या हव्यासामुळे देशी वाण मागे पडले. कालांतराने नामशेष झाले.

प्रत्येंक धानाची वेगळी गुणवैशिष्ठ आहेत. नैसर्गिक खनिजे, घटक त्यात मुलत: आहेत. मुळ जाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका आहे. सध्या तयार झालेल्या संकरित आणि संशोधित जाती मुळ जातींवर तयार झाल्या आहेत. कालांतराने मुळ जाती नष्ट झाल्यास पर्यावरण आणि निसर्गाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

- सुधीर धकाते, कृषी अभ्यासक, भंडारा

...

टॅग्स :agricultureशेती