शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

...तर अजनीमध्येही होईल ‘चिपको आंदोलन’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

नागपूर : प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. पर्यावरणाची मोठी हानी होणार ...

नागपूर : प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने सामान्य नागरिकांमध्येही असंतोष वाढत चालला आहे. एक तर प्रकल्पासाठी पर्यायी व्यवस्था करा किंवा प्रकल्पच रद्द करा, ही मागणी जोर धरत आहे. जनभावना दुर्लक्षित केली तर झाडांना व तेथील पशुपक्ष्यांना वाचविण्यासाठी आम्हालाही ‘चिपको आंदोलन’ करावे लागेल, असा इशारा सामान्य नागरिकांनी दिला.

अजनीमध्ये होऊ घातलेल्या वृक्षतोडीविरोधात जनमानसामध्ये भावना निर्माण होत आहे. रविवारी नागरिकांनी अजनी परिसरात वृक्षतोडीविरोधात मूक प्रदर्शन केले. यावेळी लोकमतने नागरिकांची भावना जाणून घेतली.

जंगलाच्या संवर्धनासाठी सामान्य नागरिकांनी कधी काळी जीवाची बाजी लावली हाेती. ही वेळ आमच्यावरही आली आहे. अजनीतील वृक्षांचे संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही मागे हटणार नाही. प्रसंगी वृक्षताेड करायला येणाऱ्या यंत्रणेविराेधात आम्ही चिपकाे आंदाेलन करू.

- अच्छमा जाेसेफ

दक्षिण नागपूर परिसरात मेडिकल व अजनीचा भाग एकमेव ग्रीन पाॅकेट आहे. येथील हजाराे झाडांची कत्तल करून सरकार कशाचा विकास साधणार आहे. ही झाडे शुद्ध हवा देतात म्हणून लाेकांचे आराेग्य चांगले आहे. आराेग्य चांगले राहणार नाही तर विकासाचे काय काम.

- श्रेयस पांडे, विद्यार्थी

ही झाडे शहराचे फुप्फुस आहेत. अजनीच्या या हजाराे झाडांमुळेच येथील वातावरणात गारवा आहे. हे केवळ मनुष्यासाठी नाही तर हजाराे पक्ष्यांचाही आधार आहेत. हीच जर राहिली नाही तर हे मुके पक्षी जाणार कुठे. या गाेष्टीचाही विचार व्हावा.

- परम कुकरेजा, विद्यार्थिनी

हळूहळू हे शहर सिमेंटच्या जंगलात रूपांतरित हाेत आहे. आतापर्यंत थाेडी फार वृक्षवल्ली टिकून असल्याने ज्येष्ठ झालेली पिढी शुद्ध हवा घेत आहे. झाडे वाचविण्याची गरज असताना ती ताेडली जात आहेत. झाडेच राहिली नाही तर आमच्या आणि येणाऱ्या पिढीची काय अवस्था हाेइल, याचाही जरा विचार करा.

- मेहा कांबळे, विद्यार्थिनी

एवढ्या माेठ्या प्रमाणात वृक्षताेड हा विकास करण्याचा नाही तर शहर भकास करण्याचा प्रकार आहे. या झाडांमुळे येथे तापमान कमी आहे, परिसरात जलस्तर अधिक आहे. ही झाडे कापली जातील तर विपरीत परिणाम हाेतील.

- कुवरसिंह मेहराेलिया

अजनीची वनराई तयार व्हायला दीडशे-दाेनशे वर्षे लागली. प्रकल्पासाठी झाडे कापायला एक दिवसही लागणार नाही. पण अशी वनसंपदा निर्माण करायला कित्येक वर्षे लागतील. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत.

- भीमराव दुपारे, ज्येष्ठ नागरिक

अगदी जन्मापासून या रेल्वे क्वॉर्टरमध्ये माझे जीवन गेले. आज वय ८६ वर्षे आहे. ही वृक्षवल्ली माझ्या जीवनाशी जुळली आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नष्ट करणार असल्याचे कळल्यावर दु:ख वाटत आहे. मात्र आम्ही ही काॅलनी वाचविण्यासाठी लढा देऊ.

- शेख हुसेन, ज्येष्ठ नागरिक

या वनराईमुळेच शुद्ध हवा मिळते. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. झाडेच नष्ट झाली तर शुद्ध हवेसाठी शोध घ्यावा लागेल. ऑक्सिजन सिलेंडर लावून फिरण्याची पाळी येईल.

- शेख कमर