शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

-तर राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे

By admin | Updated: May 25, 2016 02:32 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही.

दिग्विजय सिंह : मोदी सरकार केवळ दिखावा करीत आहेनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर त्यांना कॉंग्रेसची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी पक्षाला कॉंग्रेसमध्ये विलीन करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यास चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी केले होते. यावर सिंह यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आता पक्षात ‘सर्जरी’ची आवश्यकता आहे. या मतावर मी आजही कायम आहे. कॉंग्रेसमध्ये तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे, याचा पुनरुच्चार दिग्विजय सिंह यांनी केला. मोदी सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु विकास मात्र कुठेच दिसला नाही. आता दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करणार आहेत. केंद्र सरकारने कामे तर केलेली नाहीत, परंतु बच्चन यांचा उपयोग करुन स्वत:चा प्रचार-प्रसार करत आहेत. २६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात जाऊन मी तेथे खरोखर किती विकास झाला आहे, हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.राम नाईकांकडून अपेक्षाच नाहीउत्तर प्रदेशात बजरंग दलाकडून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शस्त्रे चालविण्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी याला योग्य म्हटले होते. यावर दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. बजरंग दल, संघ यांचे निर्माणच हिंसेतून झाले आहे. त्यांच्याशी जुळलेल्या राम नाईक यांच्याकडून इतर विचारांची अपेक्षा करूच शकत नाही, असे सिंह म्हणाले.मी माफी मागणार नाही‘बाटला एन्काऊन्टर’ बनावट होते या माझ्या वक्तव्यावर मी कायम आहे व यात माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. त्यातून सर्व बाबी समोर येतील. मोठा साजिद, छोटा साजिद कोण आहेत, याची मला काहीही माहिती नाही, असेदेखील ते म्हणाले.