शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

.. तर झाला असता अनर्थ ! नागपूर विमानतळावर छताच्या पीओपीचे तुकडे खाली पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2023 20:39 IST

Nagpur News नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आगमन क्षेत्रात’ शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. अचानक या भागातील छतातून पीओपीचे तुकडे खाली पडले. या जागेतून पावसाचे पाणी गळू लागले व फरशीवर पसरले.

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आगमन क्षेत्रात’ शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. अचानक या भागातील छतातून पीओपीचे तुकडे खाली पडले. या जागेतून पावसाचे पाणी गळू लागले व फरशीवर पसरले. या घटनेच्या वेळी काही प्रवासी सुदैवाने बचावले. एक प्रवासी मात्र किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

दुसरीकडे विमानतळ प्रशासनाचा दावा आहे की, छताच्या मेंटनन्सचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र, या घटनेमुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विमानतळ प्रशासनाला मेंटनन्सचे काम करण्याची गरज का भासली, तसेच दुरुस्तीचे काम करताना आवश्यक खबरदारी का घेतल्या गेली नाही.

शहरात गुरुवारी रात्री सरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम राहिला. या पावासाचा फटका विमानतळालाही बसला. आगमन क्षेत्रातील छताला लागलेल्या पीओपीचे तुकडे खाली पडू लागले. यावेळी फ्लाइट ६ ई-७४२७ इंदूर- नागपूरचे प्रवासी बाहेर निघत होते. प्रत्यक्षदर्शीनुसार अचानक पीओपीचे तुकडे पडल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झाला, तर बाकी सुदैवाने बचावले. विमानतळ प्रशासन व विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात पथकाने मात्र याला नकार दिला आहे.

मेंटनन्सचे काम सुरू होते

- नागपूर विमानतळाच्या ज्या भागात शुक्रवारी पीओपीचा काही भाग कोसळला व तेथून पाणी गळू लागले त्या भागात मेंटनन्सचे काम सुरू होते. यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आली होती. मेंटनन्सचे काम सुरू असताना ही घटना घडली. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तेथे आधीच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

- आबिद रुही, विमानतळ संचालक

टॅग्स :Airportविमानतळ