शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

...तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 20:20 IST

Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले.

ठळक मुद्देव्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांचा ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

 

नागपूर : समुद्रमार्गे आलेल्या लोकांनी देशाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे समुद्राकडे जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे. भारताचा ९५ टक्के व्यापार समुद्रातून होतो. त्यामुळे समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ९६ टक्के कच्चे तेल आणि ८५ टक्के वायू समुद्रातून येतो. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील. विमान वाहतूक ठप्प होईल, स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपण भारतीयांनी समुद्राचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी त्यांनी ‘भारतीय नौदलाचे महत्त्व आणि नेतृत्वावरील अंतरदृष्टी’ या विषयावर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

जर एखाद्या राष्ट्राला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर ते सर्वोच्च सागरी सामर्थ्य असले पाहिजे. सध्याची राजकीय परिस्थिती, आपली भौगोलिक स्थिती आणि भारताचे ठाम शेजारी यांचा विचार करता प्रत्येक भारतीयाने सागरी क्षेत्राचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्यांकडून अस्तित्वात येणारे धोके वास्तविक आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या मार्गांवर सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. चीनला २०४९ पर्यंत जागतिक महासत्ता बनायचे आहे आणि तो पूर्णपणे सागरी शक्ती बनण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे त्यांनी सांगितले. ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

नौदलाची १३० जहाजे ‘मेड इन इंडिया’

आत्मनिर्भर भारतामध्ये भारतीय नौदल आघाडीवर आहे. भारतीय नौदलाने पहिले जहाज १९६१ साली बांधले आणि आज १३० जहाजे पूर्णपणे भारतात तयार झाली आहेत, असे दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल