शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

...तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 20:20 IST

Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले.

ठळक मुद्देव्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांचा ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

 

नागपूर : समुद्रमार्गे आलेल्या लोकांनी देशाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे समुद्राकडे जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे. भारताचा ९५ टक्के व्यापार समुद्रातून होतो. त्यामुळे समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ९६ टक्के कच्चे तेल आणि ८५ टक्के वायू समुद्रातून येतो. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील. विमान वाहतूक ठप्प होईल, स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपण भारतीयांनी समुद्राचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी त्यांनी ‘भारतीय नौदलाचे महत्त्व आणि नेतृत्वावरील अंतरदृष्टी’ या विषयावर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

जर एखाद्या राष्ट्राला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर ते सर्वोच्च सागरी सामर्थ्य असले पाहिजे. सध्याची राजकीय परिस्थिती, आपली भौगोलिक स्थिती आणि भारताचे ठाम शेजारी यांचा विचार करता प्रत्येक भारतीयाने सागरी क्षेत्राचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्यांकडून अस्तित्वात येणारे धोके वास्तविक आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या मार्गांवर सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. चीनला २०४९ पर्यंत जागतिक महासत्ता बनायचे आहे आणि तो पूर्णपणे सागरी शक्ती बनण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे त्यांनी सांगितले. ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

नौदलाची १३० जहाजे ‘मेड इन इंडिया’

आत्मनिर्भर भारतामध्ये भारतीय नौदल आघाडीवर आहे. भारतीय नौदलाने पहिले जहाज १९६१ साली बांधले आणि आज १३० जहाजे पूर्णपणे भारतात तयार झाली आहेत, असे दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल