शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

...तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 20:20 IST

Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले.

ठळक मुद्देव्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांचा ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

 

नागपूर : समुद्रमार्गे आलेल्या लोकांनी देशाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे समुद्राकडे जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे. भारताचा ९५ टक्के व्यापार समुद्रातून होतो. त्यामुळे समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ९६ टक्के कच्चे तेल आणि ८५ टक्के वायू समुद्रातून येतो. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील. विमान वाहतूक ठप्प होईल, स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपण भारतीयांनी समुद्राचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी त्यांनी ‘भारतीय नौदलाचे महत्त्व आणि नेतृत्वावरील अंतरदृष्टी’ या विषयावर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

जर एखाद्या राष्ट्राला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर ते सर्वोच्च सागरी सामर्थ्य असले पाहिजे. सध्याची राजकीय परिस्थिती, आपली भौगोलिक स्थिती आणि भारताचे ठाम शेजारी यांचा विचार करता प्रत्येक भारतीयाने सागरी क्षेत्राचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्यांकडून अस्तित्वात येणारे धोके वास्तविक आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या मार्गांवर सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. चीनला २०४९ पर्यंत जागतिक महासत्ता बनायचे आहे आणि तो पूर्णपणे सागरी शक्ती बनण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे त्यांनी सांगितले. ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

नौदलाची १३० जहाजे ‘मेड इन इंडिया’

आत्मनिर्भर भारतामध्ये भारतीय नौदल आघाडीवर आहे. भारतीय नौदलाने पहिले जहाज १९६१ साली बांधले आणि आज १३० जहाजे पूर्णपणे भारतात तयार झाली आहेत, असे दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल