शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 21:01 IST

Nagpur News महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला.

 

नागपूर : महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला. दरवाढीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करीत नागरिकांनी ही दरवाढ कंपनीची अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराची देण असून याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिकांवर बसणार असल्याचे सांगितले. साधे दळणसुद्धा १० रूपये किलोने महाग होईल. महावितरण दरवाढ कमी असल्याचे सांगत असले तरी तब्बल ४४ टक्केपर्यंत ही दरवाढ होणार असून लोकांना बिल भरणेही कठीण होईल, असेही यावेळी नागरिकांनी सांगितले. वनामती येथील सभागृहात शुक्रवारी ई-सुनावणी घेण्यात आली.

आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार, सदस्य मुकेश खुल्लर, आय. एम. बोहरी यांनी विविध वर्गवारीतील ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले. आयोगाचे सदस्य सचिव अभिजित देशपांडे यावेळी उपस्थित होते.

महावितरणचे प्रभारी संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी यांनी वीज दरवाढीच्या आवश्यकतेबाबत सादरीकरण करताना त्यांनी सांगितले की, देशातील १८ राज्यांमध्ये लोडशेडिंग होत आहे. परंतु महाराष्ट्रात ही परिस्थिती आली नाही. कोयना प्रकल्पातील विजेचा वापर करून महावितरणने ७८५ कोटी रुपयांची बचत केली. वितरण हानी कमी केली. कंपनीने वर्ष २०२३-२४ साठी १४ टक्के व २०४-२५ साठी ११ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

ई-जनसुनावणीवरच आक्षेप

काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी या ई-जनसुनावणीवरच आक्षेप दर्शवित यात नागरिकांचा सहभाग नसल्याचे सांगितले. ते म्हणाले. ज्या नागरिकांवर दरवाढीचा भुर्दंड टाकला जात आहे त्यांचेच ऐकले जात नाही आहे. महावितरणला हानी झाली परंतु यात नागरिकांची काय चुकी. कोळसा आयात केल्याने खर्च वाढला. आता हा भुर्दंड नागरिकांवर टाकला जात आहे. खासगी कंपन्यांचे हित साधले जात आहे. काँग्रेसच्याच जॉन थॉमस यांनीसुद्धा या जनसुनावणीचा विराेध केला. ते म्हणाले, विदर्भात विजेचे उत्पादन होऊनही वीज महाग आहे.

चार वितरण कंपन्या असाव्या- गोयनका

व्हीआयएचे आर.बी. गोयनका यांनी सांगितले की, वितरण क्षेत्र अधिक सक्षम बनवण्यासाठी महावितरणला चार वितरण कंपन्यात विभाजित करायला हवे. कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वितरण कंपनी असावी आणि नवीन वीज प्रकल्प उभारण्यात नये, अशी विनंतीही त्यांनी केली. सर्वसामान्य ग्राहकांना कृषी ग्राहकांच्या थकबाकीचे व्याज भरावे लागत असल्याचे सांगत त्यांनी महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले.

शेजारी राज्यांपेक्षा वीज महाग

महेंद्र जिचकार यांनी सांगितले की, शेजारी राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज महाग आहे. अशा परिस्थितीत उद्योग चालविणे कठीण होत आहे. त्यांनी सध्याच्या वीज दरात इंधन समायोजन शुल्क जोडण्यालाही विरोध दर्शविला.

टॅग्स :electricityवीज