शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 21:01 IST

Nagpur News महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला.

 

नागपूर : महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला. दरवाढीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करीत नागरिकांनी ही दरवाढ कंपनीची अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराची देण असून याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिकांवर बसणार असल्याचे सांगितले. साधे दळणसुद्धा १० रूपये किलोने महाग होईल. महावितरण दरवाढ कमी असल्याचे सांगत असले तरी तब्बल ४४ टक्केपर्यंत ही दरवाढ होणार असून लोकांना बिल भरणेही कठीण होईल, असेही यावेळी नागरिकांनी सांगितले. वनामती येथील सभागृहात शुक्रवारी ई-सुनावणी घेण्यात आली.

आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार, सदस्य मुकेश खुल्लर, आय. एम. बोहरी यांनी विविध वर्गवारीतील ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले. आयोगाचे सदस्य सचिव अभिजित देशपांडे यावेळी उपस्थित होते.

महावितरणचे प्रभारी संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी यांनी वीज दरवाढीच्या आवश्यकतेबाबत सादरीकरण करताना त्यांनी सांगितले की, देशातील १८ राज्यांमध्ये लोडशेडिंग होत आहे. परंतु महाराष्ट्रात ही परिस्थिती आली नाही. कोयना प्रकल्पातील विजेचा वापर करून महावितरणने ७८५ कोटी रुपयांची बचत केली. वितरण हानी कमी केली. कंपनीने वर्ष २०२३-२४ साठी १४ टक्के व २०४-२५ साठी ११ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

ई-जनसुनावणीवरच आक्षेप

काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी या ई-जनसुनावणीवरच आक्षेप दर्शवित यात नागरिकांचा सहभाग नसल्याचे सांगितले. ते म्हणाले. ज्या नागरिकांवर दरवाढीचा भुर्दंड टाकला जात आहे त्यांचेच ऐकले जात नाही आहे. महावितरणला हानी झाली परंतु यात नागरिकांची काय चुकी. कोळसा आयात केल्याने खर्च वाढला. आता हा भुर्दंड नागरिकांवर टाकला जात आहे. खासगी कंपन्यांचे हित साधले जात आहे. काँग्रेसच्याच जॉन थॉमस यांनीसुद्धा या जनसुनावणीचा विराेध केला. ते म्हणाले, विदर्भात विजेचे उत्पादन होऊनही वीज महाग आहे.

चार वितरण कंपन्या असाव्या- गोयनका

व्हीआयएचे आर.बी. गोयनका यांनी सांगितले की, वितरण क्षेत्र अधिक सक्षम बनवण्यासाठी महावितरणला चार वितरण कंपन्यात विभाजित करायला हवे. कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वितरण कंपनी असावी आणि नवीन वीज प्रकल्प उभारण्यात नये, अशी विनंतीही त्यांनी केली. सर्वसामान्य ग्राहकांना कृषी ग्राहकांच्या थकबाकीचे व्याज भरावे लागत असल्याचे सांगत त्यांनी महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले.

शेजारी राज्यांपेक्षा वीज महाग

महेंद्र जिचकार यांनी सांगितले की, शेजारी राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज महाग आहे. अशा परिस्थितीत उद्योग चालविणे कठीण होत आहे. त्यांनी सध्याच्या वीज दरात इंधन समायोजन शुल्क जोडण्यालाही विरोध दर्शविला.

टॅग्स :electricityवीज