शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

... तर बंद होतील नागपूर विभागातील ९० टक्के महाविद्यालये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:29 IST

शैक्षणिक सत्र २०१०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसह तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण नागपूर विभागातील ९० टक्के तांत्रिक शिक्षा अभ्यासक्रम संचालित करणारे कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर आहे.

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शैक्षणिक सत्र २०१०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसह तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण नागपूर विभागातील ९० टक्के तांत्रिक शिक्षा अभ्यासक्रम संचालित करणारे कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर आहे. कॉलेज बंद पडू नये म्हणून खासगी कॉलेज संचालकांच्या संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्रही लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी थकीत स्कॉलरशीपची रक्कम देण्याची मागणी केली आहे.'लोकमत' ला मिळालेल्या माहितीनुसार सरकारने गेल्या ५ वर्षात कॉलेजला स्कॉलरशीपची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सरकारवर आतापर्यंत कॉलेजचे थकीत ३०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड इंजिनियरिंग कॉलेजच्या एका पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यासंदर्भात राज्य सरकारला अनेक निवेदन दिले आहे. परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही. त्याचबरोबर पारंपरिक अभ्यासक्रम संचालित करणाºया विना अनुदानित कॉलेज संस्थाचालकांच्या नुसार त्यांनाही अनेक वर्षापासून स्कॉलरशीपची रक्कम दिलेली नाही. अशात त्यांच्यासाठी सुद्धा कॉलेज संचालित करणे अवघड झाले आहे. आता कोविड-१९ च्या संक्रमणामुळे अपेक्षाच धूसर झाली आहे. कॉलेज व्यवस्थापनावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व कॉलेजच्या देखभालीसाठी आर्थिक भार वाढत आहे. जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही, तर त्यांच्याजवळ कॉलेज बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असे झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांना उच्च व तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.केंद्र सरकारने आपला वाटा दिला आहेअसोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचा ८० टक्के वाटा हा केंद्र सरकार व २० टक्के वाटा राज्य सरकारचा असतो. केंद्र सरकारने आपला वाटा राज्य सरकारला दिला आहे. परंतु राज्य सरकार आपला वाटा देऊन शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास इच्छुक नाही.गुणवत्तेवर होणार परिणामनागपूर विभागात गेल्या पाच वर्षात अनेक अभ्यासक्रमाबरोबरच कॉलेजही बंद झाले आहे. याचे कारण कॉलेजमध्ये शिक्षणाची गुणवत्ता घसरत आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नाही. यावर कॉलेजचे म्हणणे आहे की, कर्ज घेऊन कधीपर्यंत कॉलेज चालवावे. सरकार त्यांची स्थिती व अडचणींना समजून राहिलेली नाही. कारण त्यांच्याकडे कॉलेज बंद करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र