शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

... तर बंद होतील नागपूर विभागातील ९० टक्के महाविद्यालये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:29 IST

शैक्षणिक सत्र २०१०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसह तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण नागपूर विभागातील ९० टक्के तांत्रिक शिक्षा अभ्यासक्रम संचालित करणारे कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर आहे.

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शैक्षणिक सत्र २०१०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसह तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण नागपूर विभागातील ९० टक्के तांत्रिक शिक्षा अभ्यासक्रम संचालित करणारे कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर आहे. कॉलेज बंद पडू नये म्हणून खासगी कॉलेज संचालकांच्या संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्रही लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी थकीत स्कॉलरशीपची रक्कम देण्याची मागणी केली आहे.'लोकमत' ला मिळालेल्या माहितीनुसार सरकारने गेल्या ५ वर्षात कॉलेजला स्कॉलरशीपची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सरकारवर आतापर्यंत कॉलेजचे थकीत ३०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड इंजिनियरिंग कॉलेजच्या एका पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यासंदर्भात राज्य सरकारला अनेक निवेदन दिले आहे. परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही. त्याचबरोबर पारंपरिक अभ्यासक्रम संचालित करणाºया विना अनुदानित कॉलेज संस्थाचालकांच्या नुसार त्यांनाही अनेक वर्षापासून स्कॉलरशीपची रक्कम दिलेली नाही. अशात त्यांच्यासाठी सुद्धा कॉलेज संचालित करणे अवघड झाले आहे. आता कोविड-१९ च्या संक्रमणामुळे अपेक्षाच धूसर झाली आहे. कॉलेज व्यवस्थापनावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व कॉलेजच्या देखभालीसाठी आर्थिक भार वाढत आहे. जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही, तर त्यांच्याजवळ कॉलेज बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असे झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांना उच्च व तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.केंद्र सरकारने आपला वाटा दिला आहेअसोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचा ८० टक्के वाटा हा केंद्र सरकार व २० टक्के वाटा राज्य सरकारचा असतो. केंद्र सरकारने आपला वाटा राज्य सरकारला दिला आहे. परंतु राज्य सरकार आपला वाटा देऊन शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास इच्छुक नाही.गुणवत्तेवर होणार परिणामनागपूर विभागात गेल्या पाच वर्षात अनेक अभ्यासक्रमाबरोबरच कॉलेजही बंद झाले आहे. याचे कारण कॉलेजमध्ये शिक्षणाची गुणवत्ता घसरत आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नाही. यावर कॉलेजचे म्हणणे आहे की, कर्ज घेऊन कधीपर्यंत कॉलेज चालवावे. सरकार त्यांची स्थिती व अडचणींना समजून राहिलेली नाही. कारण त्यांच्याकडे कॉलेज बंद करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र