शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

मुख्य भांडारात चोरीचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : अट्टल चाेरट्यांनी काेराडी येथील वीज केंद्रातील मुख्य भांडारात चाेरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : अट्टल चाेरट्यांनी काेराडी येथील वीज केंद्रातील मुख्य भांडारात चाेरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा डाव एफआयएसएस (फुल्ली इंटिग्रेटेड सिक्युरिटी सर्व्हिलन्स) यंत्रणेने उधळला. शिवाय, चाेरट्यांना पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. ७) मध्यरात्री घडली असून, शनिवारी (दि. ९) पाेलिसांनी तक्रार स्वीकारून प्रकरण तपासात घेतले.

‘एफआयएसएस’ यंत्रणेच्या कंट्राेल रूममध्ये बुधवारी रात्री कनिष्ठ सुरक्षा अधिकारी जयंतकुमार भातकुलकर कर्तव्यावर हाेते. त्यांना वीज केंद्राच्या मागच्या भिंतीवरून काही चोरटे आत प्रवेश करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच संबंधितांना माहिती देत चाेरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातच वीज केंद्राच्या मुख्य भांडाराकडे तिघे आढळून येताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या तिन्ही चाेरट्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत.

वीज केंद्राच्या परिसरातून लोखंड, भंगार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले हाेते. येथील भंगार विकून पैसा कमावण्याचा काहींनी व्यवसाय सुरू केला आहे. वीज केंद्रातील राख वाहून नेणाऱ्या पाईप लाईन देखील चाेरीला गेल्या आहेत. चाेरट्यांच्या टाेळींनी सुरक्षा रक्षकांवर हल्ले केल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. या प्रकरणात काेराडी पाेलिसांनी काही कारणास्तव गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई केली आहे.

चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक अनुराग शुक्ला यांनी दिली असून, पाेलिसात तक्रार देखील अनुराग शुक्ला यांनीच दाखल केली आहे. भांडारात महागडे साहित्य ठेवले असून, चाेरटे त्यावर हात साफ करतात. त्यामुळे माेठे नुकसान हाेते. ‘एफआयएसएस’ यंत्रणेमुळे चाेरट्यांवर लक्ष ठेवणे साेपे झाले असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी दिली.

...

‘एफआयएसएस’ यंत्रणेचे स्वरूप

या वीज केंद्राच्या भांडार व परिसरात छाेट्यामाेठ्या चाेरीच्या घटना सामान्य झाल्या हाेता. या घटनांना आळा घालण्यासाठी वीज केंद्र प्रशासनाने सहा महिन्यापूर्वी ‘एफआयएसएस’ यंत्रणा बसविली. यात ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रणेनेद्वारे वीज केंद्राच्या चारही बाजूकडील बाहेरील भागांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केला असून, तिथे चार सुरक्षा कामगारांची २४ तास नियुक्ती केली आहे.