शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

काेअर झाेनमध्ये पर्यटन बंदीचा निर्णय व्याघ्र प्राधिकरणाने फिरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 21:10 IST

Nagpur News व्याघ्र संवर्धन याेजनेची (टीसीपी) मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना काेअर क्षेत्रात पर्यटनाची परवानगी देण्याचा नवा आदेश एनटीसीएने जारी केला आहे.

ठळक मुद्देटीसीपी मान्यताप्राप्त प्रकल्पांना परवानगीमहसूल बुडण्याच्या भीतीने रिसाॅर्ट लाॅबी सक्रिय

नागपूर : देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत घेतलेला निर्णय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने (एनटीसीए) स्वत:च फिरविला. आता व्याघ्र संवर्धन याेजनेची (टीसीपी) मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना काेअर क्षेत्रात पर्यटनाची परवानगी देण्याचा नवा आदेश एनटीसीएने जारी केला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, महसूल बुडण्याच्या भीतीने व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटन बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. दुसरीकडे जंगलात रिसाॅर्ट तयार करून गुंतवणूक केलेल्या रिसाॅर्ट लाॅबीकडूनही दबाव असल्याचे बाेलले जात हाेते. ५ जानेवारी ला एनटीसीएची १९ वी बैठक पार पडली. या बैठकीत व्याघ्र प्रकल्पातील काेअर क्षेत्रात पूर्णपणे ‘नाे एन्ट्री झाेन’ असावे, असे आदेश काढण्यात आले. बफर झाेन व उर्वरित क्षेत्रातच पर्यटनाला परवानगी देण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले हाेते. मात्र एनटीसीएने ९ मार्चला नवीन आदेश जारी केला असून, टीसीपी मंजुरी असलेल्या प्रकल्पांमध्ये पर्यटनाची परवानगी देण्यात आली आहे.

वाघ संवर्धन याेजनेतच समावेश

-व्याघ्र प्रकल्पांच्या व्याघ्र संवर्धन याेजनेच्या (टीसीपी) नियमावलीमध्ये आधीच वाघांच्या संवर्धनासह काेअर झाेनमधील पर्यटन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या नियमाचा समावेश आहे.

-यासह बफर क्षेत्राच्या पर्यटनासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांनाच प्रवेश आहे.

-रिसाॅर्टचे नियमन तसेच वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातील नागरिकांना राेजगाराला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.

-सुरक्षित क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक.

-व्याघ्र प्रकल्पाच्या काेअर झाेनमध्ये केवळ २० टक्के पर्यटनाला परवानगी असून, टप्प्याटप्प्याने तेही बंद करण्यास सांगितले आहे.

-सुरक्षित पर्यटनाच्या आड काेअर क्षेत्रात माेठ्या प्रमाणात पर्यटनाला परवानगी देण्यात आली. हळूहळू पर्यटन लाॅबी तयार झाली.

-काेअर क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक झाला. काेअर झाेनजवळच श्रीमंतांचे रिसाॅर्ट तयार झाले.

-आतातर रात्रीचे पर्यटनही सुरू करण्याचा घाट घातला जात असून, यामुळे वन्यप्रेमींमध्ये असंताेष आहे.

म्हणून मानव-वन्यजीव संघर्ष

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य सुरेश चाेपणे यांच्या मते पर्यटनाच्या अतिरेकामुळे व्याघ्र संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. व्याघ्र संवर्धन हा मूळ उद्देश बाजूला पडून पर्यटन व महसूल याला प्राधान्य मिळत आहे. मानवी हालचाली वाढल्याने वाघांच्या व इतर वन्यजीवांच्या अधिवासावर फरक पडला.

टॅग्स :Tigerवाघ