शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पूर्वीच्याच पद्धतीने होणार एमपीएससी परीक्षा; नवीन पॅटर्न २०२५ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2023 18:54 IST

Nagpur News महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाची (एमपीएससी) परीक्षा यूपीएससीच्या पॅटर्नने घेण्याच्या निर्णयाविराेधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला अखेर यश मिळाले. विद्यार्थ्यांना आता पूर्वीच्याच पद्धतीने परीक्षा देता येईल आणि नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू हाेईल.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

  नागपूर : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाची (एमपीएससी) परीक्षा यूपीएससीच्या पॅटर्नने घेण्याच्या निर्णयाविराेधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला अखेर यश मिळाले. विद्यार्थ्यांना आता पूर्वीच्याच पद्धतीने परीक्षा देता येईल आणि नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू हाेईल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीला मान्यता दिली असून आयाेगाकडून लवकरच याबाबत अधिकृत घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.

यूपीएससी प्रमाणे एमपीएससीला देखील वर्णनात्मक पॅटर्न यावर्षी पासूनच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार अभ्यासक्रम बदलण्याची तयारी एमपीएससीने सुरू केली हाेती. मात्र या निर्णयामुळे काही वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंताेष पसरला हाेता. अचानक पॅटर्न आणि अभ्यासक्रम बदलला जात असल्याने त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार हाेती. याविराेधात विद्यार्थ्यांचे एक-दीड महिन्यापासून आंदाेलन सुरू हाेते. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तात्काळ लागू करू नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. सरकारने दखल घेत नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याला मान्यता दिली. या निर्णयामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नागपूर परिसरातील उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काहींचा मात्र विराेध

नुकतेच नागपुरातील काही विद्यार्थ्यांनी नव्या पॅटर्नने परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले हाेते. एमपीएससीची तयारी करणाऱ्या एकाने सांगितले,एक ना एक दिवस नवीन पॅटर्नने तयारी सुरू करावीच लागणार आहे. केवळ २०,२५ टक्के अभ्यासक्रम बदलल्याने काही फरक पडत नाही. उलट नवीन पॅटर्न यूपीएससी प्रमाणे असल्याने केंद्रस्तराच्या परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढण्यास मदत हाेईल,असा विश्वासही या उमेदवाराने व्यक्त केला.

 

सरकारने सकारात्मक निर्णय घेतला ही चांगली गाेष्ट आहे. यामुळे जुन्या पॅटर्नने तयारी करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा २०२३ व २०२४ च्या परीक्षांची संधी मिळणार आहे. तसेच नव्याने तयारी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने तयारी करण्यास वेळ मिळणार आहे.

- उमेदवार

विद्यार्थी एकतेचा विजय असो

पुण्यातील बळीराम डोळे यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा मिळालेल्या प्रतिसादामुळे हा निर्णय होऊ शकला. सरकारचा निर्णयासाठी 'देर आये दुरुस्त आये', असे म्हणावे लागेल. कित्येक विद्यार्थ्यांना त्रास देऊन हा निर्णय झालेला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आयोगाचा आडमुठेपणा हरला आणि विद्यार्थ्यांना तर्क एकजुटीचा विजय झाला.

- उमेश कोर्राम,

स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा