शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

भ्रष्ट व्यवस्थेचा 'पाठ' अन् शिक्षणाचा 'सौदा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:38 IST

Nagpur : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेले शिक्षण हे आजही आदर व सन्मानाचे क्षेत्र. त्यामुळे हे क्षेत्र सर्वाधिक पारदर्शक असायला हवे. परंतु, काळाच्या ओघात शिक्षणाचे बाजारीकरण झाले अन् डोनेशन नावाच्या नव्या व्यवस्थेने शिक्षकाची नियुक्ती 'सरस्वती' बघून नव्हे तर 'लक्ष्मी' दर्शनाने होऊ लागली. नागपुरात तर एक पाऊल पुढेच पडले. खोटे कागद, बनावट अनुभव अन् थेट नियुक्ती व पगार सुरू असा प्रकार उघडकीस आला. शिक्षण क्षेत्रच विक्रीस काढले गेल्यावर समाजाच्या पायाभूत मूल्यांनाच सुरुंग लागतो. हे लक्षात कोण घेणार?

राजेश शेगोकारनागपूर : शिक्षण ही कोणत्याही समाजाची सर्वात मजबूत पायाभूत व्यवस्था असते. विद्यार्थी घडविणारे शिक्षक आणि त्या शिक्षकांना निवडणारी यंत्रणा - ही दोन्ही अंग जितकी पारदर्शक आणि शुद्ध, तितकीच उज्ज्वल देशाचा भविष्यकाल. परंतु, नागपुरात उघडकीस आलेल्या दोन गंभीर प्रकरणांनी शिक्षण खात्यावर काळी सावली टाकली आहे.

शाळांतील व्यवस्थापनच जर निव्वळ पैशांच्या आधारावर होणार असेल, तर गुणवत्तेचं काय? एका प्रकरणात, शिक्षक म्हणून कुठलाही अनुभव नसलेल्या पराग पुडकेला लाखोंच्या लाचेद्वारे बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक बनविण्यात आले. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड व इतर अधिकाऱ्यांनी यात थेट सहभाग घेतल्याचे आरोप आहेत. दुसऱ्या आणि त्याहूनही धक्कादायक प्रकरणात, बनावट शालार्थ आयडीद्वारे ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये भरती करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन उचलण्यात आले. वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना याच प्रकरणात निलंबित करण्यात आले असून, अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही भयानक रचना उभी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. यात केवळ आर्थिक गैरव्यवहार झाला नाही, तर गुणवत्ता वेशीवर टांगली आहे. शिक्षण ही 'सेवा' न राहता, 'सौदा' झाला. 'माझे काका मंत्रालयात आहेत', असा वाघमारे यांचा उद्धट पवित्रा आणि पुडकेला मुख्याध्यापक करण्यासाठी लाचखोरीने बनलेली शासकीय मान्यता हे दोन्ही प्रकार व्यवस्थेच्या खोलवर गेलेल्या सत्ता अन् पैशांची मस्ती हव्यास याचे दर्शन घडविते. मुळात बनावट शालार्थ आयडीद्वारे ५८० शिक्षकांना नियुक्ती देताना ज्या ज्या पायरीवर शंका उपस्थित व्हायला हवी होती, त्या - त्या पायऱ्यांवर 'प्रसाद' ठेवल्यामुळे असे कारनामे करणाऱ्यांना देवच पावला. कुठलीही शिक्षक भरती नसतानाही शिक्षकांच्या पगाराचा आकडा अचानक कसा वाढला, हे तपासणारे वेतन अधीक्षकच मॅनेज झाल्यावर लक्षात येणार तरी कोणाच्या? आता या सर्व ५८० नियुक्त्या रद्द करून त्यांच्याकडून पगाराची रक्कम वसुली तसेच फौजदारी गुन्हा दाखल केला तरच भविष्यात अशा प्रकाराला चाप बसू शकतो. विशेष म्हणजे नागपूर विभागातच हा गैरप्रकार आहे, असे मानता येणार नाही. त्यामुळे राज्यभरात असा कुठे प्रकार झाला का? याचीही चौकशी केली तर मोठे रॅकेट समोर येऊ शकते. नागपुरातील हे प्रकरण केवळ व्यक्तिगत फौजदारीपुरते मर्यादित नाहीत. ही संपूर्ण यंत्रणेची अपयशी कहाणी आहे, शिक्षण खात्यात प्रामाणिकतेचा श्वास घेण्यासाठी, कठोर कारवाई आणि एक संपूर्ण संरचनात्मक सुधारणेची व भ्रष्ट व्यवस्थेचा 'पाठ' बंद करून, सत्यता आणि गुणवत्ता यांचा 'धडा' पुन्हा शिकण्याची!

 

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर